Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ जिल्ह्याला मिळणार अहिल्यानगर नाव; ‘या’ नेत्यानं राज्य सरकारपासून केंद्रापर्यंत केला पाठपुरावा

अहमदनगर जिल्ह्याला जर अहिल्यादेवी यांचे नाव मिळणार असेल तर ते नक्कीच भूषणावह असणार आहे. अहिल्यादेवींचे कर्तृत्व फार मोठे आहे.

'या' जिल्ह्याला मिळणार अहिल्यानगर नाव; 'या' नेत्यानं राज्य सरकारपासून केंद्रापर्यंत केला पाठपुरावा
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 8:11 PM

लोणी/अहमदनगरः औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असं नामाकरण केले आहे. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यासाठी नामकरणाचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या जिल्ह्यांचे ज्या प्रमाणे नामकरण करण्यात आले आहे, त्याच प्रमाणे आता अहमदनगर जिल्ह्यालाला अहिल्यानगर नाव देणं हा भूषणावह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करणे म्हणजे ते भूषणावह असल्याचे सांगितले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबरच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ट्विट करत अहिल्यादेवी यांचे नाव या जिल्ह्याला देण्याची मागणी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडूनही अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्याची मागणी करण्यात येत होती.

त्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या मागणीचे समर्थन करत अहमदनगरला जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देणे म्हणजे भूषणावह असणार असल्याचेही त्यांनी सांगितल आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांनी ही मागणी लावून धरली होती. त्यातच आता औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे नामकरण केल्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामाकरणासाठीही आग्रह वाढला आहे. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगरच्या नामकरणाला समर्थन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्याला जर अहिल्यादेवी यांचे नाव मिळणार असेल तर ते नक्कीच भूषणावह असणार आहे. अहिल्यादेवींचे कर्तृत्व फार मोठे आहे. त्यामुळे जर अहिल्यादेवींचे नाव नगर जिल्ह्याला मिळत असले तर त्याचे आम्ही स्वागतच करू असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्यासाठी आता आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातूनही नामकरण लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांंनी सांगितले.

कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?.
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं.