AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wine In Maharashtra : मंदिरात पाण्याऐवजी वाईन द्या, डेअरी बंद करा वायनरी काढा-सदाभाऊ खोत

शेतकऱ्यांच्या नवावर सरकार बेवड्यांचं भलं करत आहे, असा आरोप सातत्याने होतोय. आता या निर्णयावर शेतकरी नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही कडाडून टीका केली आहे. मंदिरात पण्याऐवजी वाईन द्या म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

Wine In Maharashtra : मंदिरात पाण्याऐवजी वाईन द्या, डेअरी बंद करा वायनरी काढा-सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 5:09 PM

नवी दिल्लीगेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्य शासनाने वाईन दुकानात (Wine In Kirana Store) आणि सुपरमार्केटमध्ये मिळणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विरोधकांनी या निर्णयाला कडाडून विरोध करण्यास सुरूवात केली. फक्त भाजप (Bjp) नेतेच नाही, तर पुण्यातल्या व्यापाऱ्यांसह इतर अनेक घटकांतून या निर्णयाला जोरदार विरोध झाला. काल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनीही या निर्णयाला विरोध दाखवला. दोन दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांनी या निर्णयावर टीका करत राज्यपालांनी सरकार बरखास्त करावे अशी थेट मागणी केली. भाजप नेत्यांनी तर महाराष्ट्राला मद्यराष्ट्र्र बनवण्याचा हा डाव असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांच्या नवावर सरकार बेवड्यांचं भलं करत आहे, असा आरोप सातत्याने होतोय. आता या निर्णयावर शेतकरी नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही कडाडून टीका केली आहे. मंदिरात पण्याऐवजी वाईन द्या म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

डेअरी बंद करा वायनरी काढा

महाविकास आघाडी ही मद्यविक्री विकास आघाडी आहे. शेतकऱ्यांच्या नावावर दुकानदारी खपवण्यासाठी वाईनचा निर्णय घेतला गेला, गावातल्या डेअरी बंद करा आणि वायनरी काढा मंत्रालयात असा टोसा सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. त्यामुळे वाईनवरून राज्यातलं राजकारण सध्या तापलं आहे. हा निर्णय जाहीर झाल्यापासून भाजप नेते महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीतील नेते मात्र हा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतल्याचे सांगत आहेत, मात्र यामुळे शेतकऱ्यांची पोरं बेवडी होतील असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

साखर कारखान्यांतील अंतराची अट काढा

राज्य सरकारने साखर कारखान्यांमधील अंतराची अट काढून टाकावी, मग आम्ही समजेल की तुम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेत आहे, अशी मागणी खोत यांनी केली आहे. तसेच एसटी मधला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार संपायला तयार नाही. कामगारांच्या मनात धास्ती आहे, लालपरी वाचणार नाही, असेही खोत म्हणाले आहेत. हा येणारा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असेल, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत , राज्य सरकारकडे पैसेच नाहीत त्यांच्या योजना या केंद्राच्या पैशातून चालू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Students Agitation : जे भल्या भल्या नेत्यांना, अभिनेत्यांना जमत नाही ते हिंदुस्थानी भाऊने कसे करुन दाखवलं? कसे जमा केले विद्यार्थी?

Aurangabad | महापालिका निवडणूक मनसे ताकदीनं लढणार, पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय

शिवसेनेने शब्द पाळला, उत्पल पर्रीकरांविरोधातील उमेदवारी मागे, भाजपचं टेन्शन वाढलं

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.