AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जी लोकं १७ दारं फिरले त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, अंबादास दानवे यांचा रोख कुणावर?

शिवसेना सत्तेसाठी नाही तर सत्ता शिवसेनेसाठी आहे. सत्ता निश्चितपणे शिवसेनेकडे येईल, असा आशावाद अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

जी लोकं १७ दारं फिरले त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, अंबादास दानवे यांचा रोख कुणावर?
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 4:44 PM

कुणाल जायकर, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली टीका केली. नैतिकतेच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. एवढे मोठे मुख्यमंत्री पदावर लाथ मारली, ही उद्धव ठाकरे यांची नैतिकता नाही का? गद्दारी करून- करून लोकं गेले. वर्षावर कित्तेक लोकं बसले होते. मनाने तिकडे आणि शरीराने इकडे असाल, तर मला काय करायचं आहे. तुम्ही जा, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले होते. आपल्या रक्तमासाची लोक आपल्याला सोडून गेले. त्या हेतुने नैतिकेतून त्यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला याचा कोणताही पश्चाताप होत नाही, असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

पहाटेचा शपथविधी ही कुठली नैतिकता?

शिवसेना सत्तेसाठी नाही तर सत्ता शिवसेनेसाठी आहे. सत्ता निश्चितपणे शिवसेनेकडे येईल, असा आशावाद अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी रात्री तीन वाजता राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवण्याची गरज नाही. पहाटे तीन-चार वाजता घेतलेला शपथविधी ही कोणती नैतिकता होती, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, असंही अंबादास दानवे यांनी म्हंटलं.

भाजपने आम्हाला नैतिकता शिकवण्याची गरज नाही

राजभवनात शपथ घेतली ती कोणती नैतिकता होती. मेहबूबा मुक्तीसोबत तुम्ही गेलात, ही कोणती नैतिकता आहे. संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नीतीश कुमार यांच्याबरोबर तु्म्ही सरकार स्थापन केलात, ही कोणती नैतिकता आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला नैतिकता शिकवण्याची गरज नाही, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला. जे पहाटे तीन-चार वाजता शपथविधी घेतात त्यांना आम्हाला नैतिकतेच्या गोष्टी सांगण्याची गरज नाही, असं अंबादास दानवे यांनी सुनावलं.

हे सुद्धा वाचा

नितेश राणे हा चिल्लर माणूस

नितेश राणे हा चिल्लर माणूस आहे. त्यांचे वडील कुठे कुठे जाऊन आले. शिवसेना, काँग्रेस, स्वाभीमान पक्ष स्थापन केला. आता भाजपात गेले. त्यांनी 17 दार केले. ते भारतीय जनता पार्टीच्या तुकड्यावर पाळले जातात, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा खरपूस समाचार अंबादास दानवे यांनी घेतला.

सर्वोच्च न्यायालयाचा १४५ पानांचा अहवाल. निकालाचं वाचन श्रीकांत शिंदे यांनी केलं पाहिजे. तसेच त्यांच्या गद्दार सहकाऱ्यांनी केले पाहिजे. सुस्पष्टपणे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचे परिणाम दिसतील.

ठाकरे यांच्यावर टीका करणे ही नमक हरामी

संजय शिरसाट हे माता बहिणींवर टीका करतात. ठाकरे साहेब यावेत म्हणून चार-चार वेळा त्यांचे दारं झिजवत होते. ठाकरे साहेबांनी आपल्या मतदारसंघात यावे, म्हणून दहा-दहा वेळा जात होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे ही नमक हरामी आहे. त्यामुळे यांच्या टीकेला काय उत्तर द्यायचं.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला आहे. राज्यपालांनी चुकीचे केले हे स्पष्टपणे सांगितले. जनाची नाही, तर मनाची लाज वाटली पाहिजे. आतापर्यंत निकाल ऐकून राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.