मोठी बातमी! विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा ठराव
मोठी बातमी समोर येत आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे. विद्रोही साहित्य संमेलनामध्ये एकूण 29 ठराव घेण्यात आले, त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, असा ठराव देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं, या साहित्य संमेलनामध्ये एकूण 29 ठराव घेण्यात आले आहेत, त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा असा देखील ठराव घेण्यात आला. धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे, तर दुसरीकडे आता विद्रोही साहित्य संमेलनामध्ये देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत आहे, त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून वारवांर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनामध्ये देखील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे.
दरम्यान दुसरीकडे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे, त्यांनी याबाबतची तक्रार ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती. त्यानंतर आता न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, याबाबत आता 15 मार्च रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.