AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज पौर्णिमा की अमावस्या… कुणाचा बकरा कापणार; संजय राऊत यांनी पुन्हा शिंदेंना डिवचले

नाशिक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जोरदार मेळावा झाला. या मेळाव्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे जोरदार भाषण झाले. आपल्या छोटेखाणी परंतू जोरदार भाषणात राऊत यांनी शिवसैनिकांत चैतन्य फुलवण्याचा प्रयत्न केला.

आज पौर्णिमा की अमावस्या... कुणाचा बकरा कापणार; संजय राऊत यांनी पुन्हा शिंदेंना डिवचले
sanjay raut at nashik melawa
Follow us
| Updated on: Apr 16, 2025 | 7:11 PM

अनेकांना वाटलं पराभव झाला म्हणून शिवसैनिक खचला असेल. शिवसैनिक घरी बसला असेल. दहशतीखाली आहे असंही अनेकांना वाटलं असेल. पण आजच्या शिबीराने दाखवून दिले की नाशिकचा शिवसैनिक खणखणीत आहे. अशा पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. या पेक्षा वाईट काळ आपण पाहिला आहे. स्वत: शिवसेना प्रमुखांनी अनुभवला आहे. सगळ्या खराब काळाची जी व्यक्ती साक्षी असते ती उज्जवल भवितव्याची निर्माती असते असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. नाशिक येथे शिवसेना पक्षाचा मेळावा झाला त्यात ते मार्गदर्शन करीत होते.

संजय राऊत यांनी त्यांच्या भाषणात पराभवाचे समीक्षणच केले. ते यावेळी म्हणाले की नाशिकचा पराभव का झाला. आपण खूप विश्लेषण केलं. नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झालं. तुलसी गॅबार्ड. नाव लक्षात ठेवा. ही साधी बाई नाही. ती मोदीची बहीण आहे. मोदी तिला ‘सिस्टर तुलसी’ असं संबोधतात. मोदी आता अमेरिकेत गेले होते. गंगाजल घेऊन गेले होते. तुलसी गबार्डला मोदी यांनी गंगाजल भेट दिले आहे. ही बाई साधी नाही. ही ट्रम्प सरकारच्या गुप्तचर विभागाची प्रमुख आहे. तिने सांगितलं परवा की ईव्हीएम हायजॅक होतं आहे. ईव्हीएममुळे निकाल बदलले जाऊ शकतात. तुलसी यांनीच हे सांगितले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखाने सांगितले आहे. मोदींच्या बहिणीने सांगितलं. तिच्या हातात गंगाजल आहे ती खोटं बोलणार नाही असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

मोदींनी तिच्या हाती गंगाजल दिलं ती खोटं बोलणार नाही. ईव्हीएममुळे घोटाळा होतोय हे जेव्हा तुलसी गॅबार्ड सांगते तेव्हा महाराष्ट्राचा निकाल असा का लागला त्याचं उत्तर जगाला मिळतं. मग आम्हाला वाटतंय, नाशिकमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, देशात गेल्या १० वर्षापासून काय चाललंय. या शिबीराला तुलसी गॅबार्डलाच बोलवायला हवं होतं मार्गदर्शन करण्यासाठी. तुलसी गॅबार्डला पुढच्यावेळी विधानसभेच्या आधी बोलावूया मार्गदर्शनासाठी असेही ते यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत..

आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. मोदी, शाह, फडणवीस तुम्ही कधी हिंदू झालात. एक सुंदर वाक्य आहे. जो जितका पापी कपटी आणि पाखंडी असतो तो हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो… आम्ही आहोत हिंदुत्ववादी, आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलं आहे. आजच्या शिबीराचा एकच संदेश आहे, आम्ही लढायला तयार आहोत. तुम्ही खोटे गुन्हे दाखल करा. आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. आम्ही आमच्या नेत्याच्या मागे उभं राहू. उद्धव ठाकरे यांच्या मागे उभं राहू असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

अमावस्या आल्यावर भीती वाटते

राज्यात सध्या ठाणे की रिक्शा, चेहरे पे दाढी. चष्मा. हे महाशय गावाला गेले आहे. मला भीती वाटते. आज पौर्णिमा आहे. अमावस्या आहे. कुणाचा बकरा कापणार आहे. आता महाराष्ट्राला पौर्णिमा अमावस्या आल्यावर भीती वाटते. हा महाराष्ट्र कधीच अंधश्रद्धाळू नव्हता असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हणाले.

मोदींनी आदमपूर एअरबेसबाबत पाकच्या खोट्या दाव्यांचा बुरखा टराटरा फाडला
मोदींनी आदमपूर एअरबेसबाबत पाकच्या खोट्या दाव्यांचा बुरखा टराटरा फाडला.
शोपियानमध्ये ठार केलेल्या 2 दहशतवाद्यांची ओळख पटली
शोपियानमध्ये ठार केलेल्या 2 दहशतवाद्यांची ओळख पटली.
ऑपरेशन सिंदूरचा हिरो, ज्याच्यामुळे पाकला फुटला घाम, अमरप्रीत सिंग कोण?
ऑपरेशन सिंदूरचा हिरो, ज्याच्यामुळे पाकला फुटला घाम, अमरप्रीत सिंग कोण?.
मुख्यमंत्री फडणवीसांचा नांदेडच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना फोन
मुख्यमंत्री फडणवीसांचा नांदेडच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना फोन.
पाकचा ड्रोन हल्ला उधळला, ड्रोनचे भाग छतावर; घराचं नुकसान...व्हिडीओ बघा
पाकचा ड्रोन हल्ला उधळला, ड्रोनचे भाग छतावर; घराचं नुकसान...व्हिडीओ बघा.
वर्षभराच्या चिमूकल्याला घरी सोडून आई सीमेवर रवाना
वर्षभराच्या चिमूकल्याला घरी सोडून आई सीमेवर रवाना.
CSMTला क्लिनिंग मशीन ट्रॅकवर अन् मोटारमॅनने जागीच थांबवली ट्रेन...
CSMTला क्लिनिंग मशीन ट्रॅकवर अन् मोटारमॅनने जागीच थांबवली ट्रेन....
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर..
पंतप्रधान मोदी थेट आदमपूर एअर बेसवर पोहोचले, त्यानंतर...
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक.
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.