AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात 5 कोटी लोकांनी मतदान केले, मग 7 कोटींपेक्षा जास्त मतमोजणी कशी? संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले ईव्हीएमला गर्भ ….

’ईव्हीएम’वर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कारण महाराष्ट्रात इतके दळभद्री निकाल लागूच शकत नाहीत!", असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्रात 5 कोटी लोकांनी मतदान केले, मग 7 कोटींपेक्षा जास्त मतमोजणी कशी? संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले ईव्हीएमला गर्भ ....
संजय राऊत
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 8:43 AM

Sanjay Raut Allegation EVM Counting : “लोकसभेपेक्षा ही निवडणूक अधिक संघर्षाची आहे हे मान्य करून विधानसभा निवडणूक लढवण्यात आली. पण निवडणूक यंत्रणाच विकली गेली. झालेल्या मतदानापेक्षा काही लाख मते जास्त मोजली गेली. त्यामुळे निकाल फिरला. विधानसभेच्या निकालानंतर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण नाही. फडणवीस – शिंदे कसे जिंकले? हा प्रश्न जनतेला पडला आहे. विजयाला शंभर बाप असतात. पराभव बेवारस ठरतो. महाराष्ट्रातील निकालानंतर एक गूढ आणि भयाण शांतता पसरली आहे. कुठे उत्सव नाही, जल्लोष नाही. जणू जनतेच्या मनाविरुद्ध निकाल लागले. ’ईव्हीएम’वर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कारण महाराष्ट्रात इतके दळभद्री निकाल लागूच शकत नाहीत!”, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांनी ईव्हीएमवर आणि महाराष्ट्राच्या निकालावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ईव्हीएमबद्दल काही गंभीर मुद्देही उपस्थितीत केले. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान झाले तेव्हा महाराष्ट्रात 5 कोटी 70 लाख लोकांनी मतदान केले होते. 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाली तेव्हा 7 कोटी 70 लाख मते मोजली गेली. हे ’वरचे’ 2 कोटी मतदान आले कोठून? हे इतके मतदान वाढले कसे? ईव्हीएमला गर्भ राहिला काय? असे गंभीर सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

रोखठोकमधील महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्रात लागलेल्या आश्चर्यकारक निकालांवर चर्चा करणे म्हणजे भिंतीवर डोकं फोडून घेण्यासारखे आहे. ”मोदी-शहा दिल्लीत सत्तेवर आहेत तोपर्यंत निवडणुका लढवायला नकोत,” यावर आता सगळ्यांचेच एकमत होत आहे. निष्पक्ष निवडणुकांचा काळ संपला आहे हे भाजपच्या राजकारणास विरोध करणाऱ्या पक्षांनी समजून घेतले पाहिजे. 23 तारखेला सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीस पोस्टल बॅलट (मतपत्रिका) मोजण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रात 138 मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. सामना बरोबरीचा होता. 9 वाजता महायुती व महाविकास आघाडीत प्रत्येकी 137 जागांवर आघाडी दाखवत होते. बरोबर 10 वाजता आकडे बदलले. महाविकास आघाडी फक्त 53 व महायुती 211 असे उलटफेर झाले. निवडणुकांत हार-जीत होत असते. लोकशाहीचे हेच खरे स्वरूप आहे, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात जे घडले ती लोकशाहीची सरळ सरळ हत्याच आहे. भाजप, शिंदे गट, अजित पवार यांनी दोनशेच्या वर जागा जिंकल्या. या ’ईव्हीएम’ निकालावर विश्वास ठेवायला जनता तयार नाही. ’ईव्हीएम’ हा भारतीय लोकशाहीला लागलेला शाप आहे. हा शाप भारताचे अस्तित्वच नष्ट करेल की काय? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

जोपर्यंत ईव्हीएम हटवून बॅलट पेपरवर निवडणुकांची सुरुवात होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राप्रमाणे लोकशाहीची हत्या होतच राहील. अमेरिका, इंग्लंडसारखे आधुनिक सुधारणावादी देशदेखील त्यांच्या निवडणुकांत ईव्हीएमचा वापर करत नाहीत. अमेरिकेत एलन मस्क याने वारंवार जाहीर केले, ईव्हीएम हा जम्बो घोटाळा असून सर्व ईव्हीएम एकाच वेळी हॅक करून हवे तसे मतदान करून घेता येते. मस्कपासून अमेरिका, युरोपसारखी राष्ट्रे मूर्ख व भारतात मोदी-शहा व त्यांचा भाजप तेवढा शहाणा! महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचे निकाल ज्या पद्धतीने लावण्यात आले, त्यानंतर देशातील निवडणूक प्रक्रियेवर कोणाचा विश्वास राहील असे वाटत नाही. त्याच ईव्हीएमची वकिली आता सुप्रीम कोर्ट करत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.

महाराष्ट्रातील मतदानाच्या टक्केवारीत कसे बदल झाले? त्या आकडय़ांच्या जंतर मंतरवरही दुर्लक्ष करून चालणार नाही. 20 तारखेला 5 वाजता मतदानाची टक्केवारी 58.22 टक्के होती. त्यानंतर रात्री 11.30 वाजता ती टक्केवारी 65.02 टक्के झाली. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतदानाची टक्केवारी 68.05 टक्के झाली. हे इतके मतदान वाढले कसे? ईव्हीएमला गर्भ राहिला काय? असेही संजय राऊत म्हणाले.

LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त.
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना.
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....