Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी आक्रमक..! देवेंद्र फडणवीस यांना थेट इशाराच दिला, ताफा अडविणार म्हणजे अडविणारच…

नाशिकच्या लाँग मार्चला दिलेले आश्वासन अशा या विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

शेतकरी आक्रमक..! देवेंद्र फडणवीस यांना थेट इशाराच दिला, ताफा अडविणार म्हणजे अडविणारच...
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 5:23 PM

सोलापूर : राज्यातील शेतकरी सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यातच शेतमालाला ना योग्य बाजारभाव मिळतो, ना शेतीपिकासाठी योग्य निसर्गाची साथ मिळते त्यामुळे राज्यातील बळीराजा संकटांचा सामना करत आहे. त्यातच सरकारकडून फक्त अश्वासनांची खैरात होते, प्रत्यक्षात मात्र ना मदत मिळते ना सरकार शेतकऱ्यांच्या कामी येते. यामुळेच आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. उद्या देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना इशारा देत देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडविणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

त्यामुळे उद्याचा दिवशी राजकीय वातावरण आणखी तंग असणार असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना दिलेली अश्वासनं भाजपकडून पूर्ण झाली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी राग व्यक्त करत आता ताफा अडविणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोलापुरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त ते उद्या सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.

त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा ताफा अडविण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. यावेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना अखिल भारतीय किसान सभेने इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातही गतवर्षी झालेल्या खरीप, रब्बी पिकांच्या नुकसान भरपाईचे अनुदान अद्याप शेतकर्‍यांना मिळाले नाही.

त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही थकीत 385 कोटी रुपये शेतकर्‍यांना कारखानदारांकडून येणे बाकी आहे. त्यामुळे ते बिल शेतकऱ्यांनी तात्काळ मिळावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नाशिकच्या लाँग मार्चला दिलेले आश्वासन अशा या विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवानंद झळके यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला असून शेतकऱ्यांना दिलेली अश्वासनं पूर्ण करा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ होणार असल्याने त्यांच्या या दौऱ्यानिमित्त शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. याबाबतचे शेतकऱ्यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.

शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्.
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'.
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल.