AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“करमाळ्याचे पाणी पुण्याला कधी गेले हे तुम्हाला समजले नाही”;भाजप नेत्याने पवारांचे नाव न घेता केली सडकून टीका

पुण्याच्या पुढाऱ्यांनी फक्त जनतेला मृगजळ दाखवण्याचंच काम केलं आहे. त्यामुळेच करमाळ्याचे पाणी कधी पुण्याला गेले हे कुणालाच समजले नाही अशी टीका शरद पवारांचे नाव न घेता करण्यात आली आहे.

करमाळ्याचे पाणी पुण्याला कधी गेले हे तुम्हाला समजले नाही;भाजप नेत्याने पवारांचे नाव न घेता केली सडकून टीका
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 4:22 PM

सोलापूर : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार राज्याचा कारभार चालवू लागले. तर महाविकास आघाडीला अडीच वर्षात पायउतार व्हावे लागल्यानंतर महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप असा वाद आता रंगला आहे. त्यातच आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज सोलापूरातील करमाळा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे हे फेसुबकवरचे मुख्यमंत्री असल्याची टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता पुण्याच्या पुढाऱ्यांनी फक्त मृगजळ दाखवण्याची सवय लावली असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला आहे.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार प्रहार केला. उद्धव ठाकरे यांच्यावर ज्या प्रमाणे त्यांनी फेसबुकवर मुख्यमंत्री सांगायचे माझं कुटुंब, तुमची जबाबदारी अशी खोचक टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी शरद पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे नाव घेतले नाही मात्र पुण्याच्या पुढाऱ्यांना फक्त मृगजळ दाखविण्याची सवय लावली आहे अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली आहे.

पुण्याच्या पुढाऱ्यांना फक्त मृगजळ दाखविण्याची सवय आहे हे असा टोलाही त्यांनी पवारांना लगावला आहे. त्याचबरोबर करमाळा तालुक्याचे पाणी कधी पुण्याला गेले हे तुम्हाला समजलेही नाही, आपण फक्त झेंडे खांद्यावर घेऊन आयुष्यभर फिरत राहिला अशी बोचरी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

करमाळा येथील स्वर्गीय दिगंबरराव बागल कृषी महोत्सवावेळी बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन.
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....