Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर इंडियाच्या विमानास उशीर, खासदार सुप्रीय सुळे संतप्त, उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी थेट…

एअर इंडियाच्या विमानांना सतत उशीर होत आहे. हे अस्वीकार्य आहे. आम्ही प्रवाशासाठी प्रीमियम शुल्क देऊन तिकीट घेतो. त्यानंतरही विमानांचे उड्डान वेळेवर होत नाही. व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, मुलांना या सर्व कुप्रबंधनाचा फटका बसतो.

एअर इंडियाच्या विमानास उशीर, खासदार सुप्रीय सुळे संतप्त, उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी थेट...
Supriya SuleImage Credit source: TV 9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 22, 2025 | 11:53 AM

विमान प्रवास करताना विमानांना उशीर होण्याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. त्यानंतर यासंदर्भात कोणतीही पावले उचलली जात नाही. विमान प्रवास करताना विमानांना उशीर झाल्यास संबंधित विमान कंपनी काहीच दखल घेत नाही. आता सर्वसामान्यांच्या भावनांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हात घातला आहे. एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करताना त्यांनाही विमानास उशीर होण्याचा अनुभव आला. त्यामुळे त्या संतप्त झाला. त्यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर ट्विट करत विमान कंपन्यांचे उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी केली.

सुप्रिया सुळे यांनी एक्सवर लिहिले, मी एअर इंडियाची फ्लाइट AI0508 ने प्रवास करत आहे. या विमानास 1 तास 19 मिनिटे उशीर झाला आहे. विमानास उशीर होणे ही सवयच बनली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत असतो. हे अस्वीकार्य आहे. केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी या प्रकरणात लक्ष द्यावे. त्यांना आग्रह आहे की एअर इंडियासारख्या विमानांना वारंवार होणाऱ्या उशिराबद्दल उत्तरदायित्व निश्चित करावे. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात यावी.

सुप्रिया सुळे यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. त्यात लिहिले आहे की, एअर इंडियाच्या विमानांना सतत उशीर होत आहे. हे अस्वीकार्य आहे. आम्ही प्रवाशासाठी प्रीमियम शुल्क देऊन तिकीट घेतो. त्यानंतरही विमानांचे उड्डान वेळेवर होत नाही. व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, मुलांना या सर्व कुप्रबंधनाचा फटका बसतो. यामुळे नागरिक उड्डयन मंत्रालयाने कारवाई करावी, तसेच एअर इंडियाचे उत्तरदायित्व निश्चित करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

एअर इंडियाकडून स्पष्टीकरण

एअर इंडियाकडून सुप्रिया सुळे यांच्या पोस्टवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एअर इंडियाने म्हटले आहे की, विमान उड्डानास उशीर होणे हे खूप निराशाजनक आहे. परंतु कधी कधी आमच्या नियंत्रणापलीकडे ऑपरेशनल संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे उड्डानेचे शेड्यूल प्रभावित होते. मुंबई जाणाऱ्या तुमच्या विमानास याच कारणामुळे उशीर झाला.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.