Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईसोबतच ठाण्यात उष्णलाट, विदर्भावर सूर्य कोपला, पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाचा काय इशारा?

Maharashtra Weather : बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे राज्यात तापमानात वाढ होत आहे. मध्य भारत, उत्तर-पश्चिम राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात 2 ते 4 अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे चक्कर येणे, डोके दुखणे, दम लागणे अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

मुंबईसोबतच ठाण्यात उष्णलाट, विदर्भावर सूर्य कोपला, पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाचा काय इशारा?
Maharashtra Heatwave
Follow us
| Updated on: Apr 08, 2025 | 12:34 PM

Maharashtra Heatwave : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. अनेक शहरांचे तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने मुंबईसोबतच ठाण्यात उष्णलाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उष्ण आणि दमट वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.

मुंबई- ठाण्यात तापमान वाढले

मुंबईसह ठाणे शहराचे बाढते तापमान शहराला उष्णलाटेकडे घेऊन जात असल्याचे दिसत आहे. ठाण्याचा पारा आज विक्रमी ४२ अंशांवर पारा पोहोचला. यामुळे ठाणे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. आरोग्य विभाग उष्माघाताकडे लक्ष ठेवून आहे. तीन दिवसांपासून तापमान एका एका अंशाने वाढत आहे. सोमवारपर्यंत हा पारा तीन अंशांनी वाढून ४२ अंशावर वर पोहोचला आहे. पुढील दोन दिवसांत हे तापमान आणखी वाढू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

विदर्भात उच्चांकी तापमान

विदर्भावर सूर्य कोपला आहे. अकोल्याचे कमाल तापमान 44 अंशावर पोहोचले आहे. तापमानात सरासरीपेक्षा चार अंशांनी वाढ झाली आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान 44.2 अंश अकोला शहरात नोंदवले गेले. आता पुढील दोन दिवस विदर्भात उष्ण लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील ब्रह्मपुरीमध्ये 43.8, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये 43.6° तर नागपुरात 42.4 वाशीम 42.2, वर्धा 42.4, यवतमाळ 42 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

हे सुद्धा वाचा

का वाढत आहे तापमान

बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे राज्यात तापमानात वाढ होत आहे. मध्य भारत, उत्तर-पश्चिम राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात 2 ते 4 अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे चक्कर येणे, डोके दुखणे, दम लागणे अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारी गरजेशिवाय बाहेर पडू नये, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. राज्यभरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताकरिता विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.