AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : यामुळेच आमच्यावर मतांचा पाऊस…एकनाथ शिंदे यांनी सांगितले ते गुपीत

Eknath Shinde reveals : मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीचा CM कोण होणार हा सस्पेन्स संपलेला नसतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाण्यातील घरी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी महायुतीला इतकी भरभरून मतं का पडली, याचे ते गुपीत उघडं केले. काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Eknath Shinde : यामुळेच आमच्यावर मतांचा पाऊस...एकनाथ शिंदे यांनी सांगितले ते गुपीत
एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 4:19 PM

महायुतीचा मुख्यमंत्री कोण होईल, यावर गेल्या दोन दिवसांपासून खल सुरू आहे. महायुतीचा सीएम कोण असा सवाल करण्यात येत होता. शिवसेना आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचा दावा करण्यात येत होता. या घडामोडी घडत असतानाच एकनाथ शिंदे यांनी तातडीने ठाणे येथे त्यांच्या घरी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी महायुतीला इतकी भरभरून मतं का पडली, याचं गुपीत उघडं केले. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत त्यांचे मत सुद्धा जाहीर केले. काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मला वेदनांची जाणीव

मी भाषणात आई आणि पत्नीचा विषय मांडला. ते कसं घर चालवायचे. काटकसर कशी करायचे हे मी सांगायचो. पण माझ्याकडे काही अधिकार आला तर या सर्वांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे असं मला वाटत होतं. महिला असतील किंवा रुग्ण असतील यांच्यासाठी काही ना काही करायचं होतं. त्या परिस्थितीतून गेल्यावरच या गोष्टी कळतात. मी गरीब कुटुंबातून आल्याने मला या वेदना समजत होत्या. त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून मी त्या गोष्टी केल्या, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

सर्वसामान्यांच्या जीवनात बदल केला

महिला आणि लाडक्या भावांसाठी आम्ही काम केलं. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काही ना काही देण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही पैसे वाटत होतो म्हणू न आम्हाला विरोध होत होता. पण आम्ही मागे पाहिलं नाही. आम्ही अडीच वर्षात आम्ही काम केलं . काही तरी देऊ शकलो याचं समाधान आहे. आम्हाला मोदी आणि शाह यांचं पूर्ण पाठबळ होतं. आम्ही सरकार बदललं आणि उठाव केला तेव्हा अमित शाह म्हणाले चट्टान की तरह आपके पिछे खडे आहे. ते अडीच वर्ष माझ्या पाठी होते. मला सुरुवातीचे दिवस आठवतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक दिवसाचा वापर राज्यासाठी केला, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

का पडला मतांचा पाऊस?

राज्य आणि केंद्र सरकार समविचारी असते तेव्हा राज्याच्या प्रगतीचा वेग गतिमान होतो. त्यामुळे अडीच वर्षाच्या काळात मी समाधानी आहे. मी काही डिटेल्समध्ये जाणार नाही. पण आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. आतापर्यंतच्या सरकारने असे निर्णय घेतले नव्हते. आम्ही सर्वांबाबत निर्णय घेतले. कुणाचेही प्रश्न ठेवले नाही. सिंचनाच्या १२४ प्रकल्पांना आम्ही मान्यता दिल्या. पूर्वी चार प्रकल्पांना मान्यता मिळायच्या. राज्याच्या प्रगतीचा वेग मोठा होता. आम्ही राज्य एक नंबरला नेण्याचं काम केलं, असे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्य एक नंबरला होतं. महाविकास आघाडीच्या काळात तीन नंबरला होतं. आम्ही सहा महिन्यात नंबर वनला आणलं. या निवडणुकीत जो मतांचा वर्षाव झाला, तो केवळ आणि केवळ आम्ही जे काम केलं, निर्णय घेतले आणि जी सकारात्मकता दाखवली. त्यामुळे आमच्यावर मतांचा पाऊस पडला असा दावा शिंदे यांनी व्यक्त केला. लाडक्या बहिणीचा सख्खा लाडका भाऊ ही माझी ओळख झाली. बाकीचे सावत्र भाऊ झाले, असे ते म्हणाले.

'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला
'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला.
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट.
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी.
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर.
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.