‘ठाकरे गटाच्या 8 आमदारांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून देणार’, शिवसेना नेत्याचा मोठा दावा

"विरोधकांकडे दुसर काहीच भांडवल नाहीय. अशा कुठल्या जागा आहेत, ज्या वाटाघाटीसाठी थांबल्या आहेत, बदनामी करण, आपलं काही साध्य होतय का पाहण? म्हणून विरोधक प्रयत्न करतायत. पण महायुती अजूनही मजूबत आहे"

'ठाकरे गटाच्या 8 आमदारांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून देणार', शिवसेना नेत्याचा मोठा दावा
uddhav thackeray
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 11:57 AM

महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजून सुटत नाहीय. राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सांमत यांनी माघार घेत असल्याच सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. नंतर त्यांनी टि्वट डिलीट केलं. त्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरचा दावा सोडणार नसल्याच जाहीर केलं. या दरम्यान त्यांनी एक मोठा दावा केला. “ठाकरे गटाच्या उरलेल्या आमदारांपैकी 8 आमदार माझ्या संपर्कात आहेत. मी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत भेट घडवून देणार आहे. हवं तर त्यांची नाव सांगतो. नंतर ते म्हणाले की, प्रवेशाच्यावेळी नाव सांगेन”

रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा नारायण राणेंकडे जाणार का? या प्रश्नावर ते म्हणाले की, “विरोधकांकडे दुसर काहीच भांडवल नाहीय. अशा कुठल्या जागा आहेत, ज्या वाटाघाटीसाठी थांबल्या आहेत, बदनामी करण, आपलं काही साध्य होतय का पाहण? म्हणून विरोधक प्रयत्न करतायत. पण महायुती अजूनही मजूबत आहे” “रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीवर कसालाही परिणाम होणार नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग फार मोठ्या फरकाने जिंकू असं मला वाटत. सोशल मीडियावर एखाद्याची व्यक्तीगत पोस्ट म्हणजे पक्षाची भूमिका नसते” असं उदय सामंत म्हणाले.

राजकारणात भावनिक होण ठीक आहे, पण….

“मी शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतोय. शिंदे साहेबांनी तो मतदारसंघ निरीक्षणासाठी माझ्याकडे दिलाय. पक्षीय निर्णय मी घेतो. त्या टि्वटमुळे कोणाचा गैरसमज झाला असेल, तर दूर झाला पाहिजे. माझ्या दृष्टीने तो प्रश्न संपलेला आहे. ही जागा शिवसेनेकडेच रहावी. राजकारणात भावनिक होण ठीक आहे. पण सोशल मीडियाचा वापर होऊ नये” असं त्यांनी सांगितलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.