AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता नितीन गडकरी म्हणलेत म्हणल्यावर तरी होईलच, मुख्य रस्त्याच्या चौपदरी करणाबाबत लातूरकरांना आश्वासन

लातूर येथेही विविध विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्यान अनुशंगानेच ते दाखल झाले होते. या दरम्यान, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील आयोजित कार्यक्रमात त्यांनी लातूर-टेंभूर्णी या रस्त्याचेदेखील चौपदरीकरण होणा असल्याचे सांगितले.

आता नितीन गडकरी म्हणलेत म्हणल्यावर तरी होईलच, मुख्य रस्त्याच्या चौपदरी करणाबाबत लातूरकरांना आश्वासन
लातूर येथील जाहीर सभेत संबोधित करताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 5:19 PM
Share

लातूर : संबंध देशभर रस्ते बांधणीत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे योगदान आहे. लातूर येथेही विविध विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्यान अनुशंगानेच ते दाखल झाले होते. या दरम्यान, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील आयोजित कार्यक्रमात त्यांनी लातूर-टेंभूर्णी या रस्त्याचेदेखील चौपदरीकरण होणा असल्याचे सांगितले. आता पर्यंत या रस्त्याबाद्दल अनेकांनी आश्वासने दिली पण ती पूर्ण केली नाहीत. मात्र, आता खुद्द रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांनीच आश्वासन दिल्याने या रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण होईल असा विश्वास लातूरकरांनाही वाटू लागला आहे.

राष्ट्रीय महामार्ग 752 वर देशात प्रथमच मलेशियन ड्युरा हे तंत्रज्ञान वापरुन पूल बनविण्यात आला आहे. त्याच्या पाहणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लातूरमध्ये दाखल झाले होते. मराठवाड्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठा प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अनेक दिवसांपासून रखडले लातूर-टेंभुर्णी रस्त्याचे काम

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठावड्याला जोडणारा हा लातूर – टेभूर्णी मार्ग आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम हे रखडेले आहे. या रस्त्याच्या कामाचे आश्वासने देऊन अनेकांनी निवडणुकाही जिंकल्या. मात्र, रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. मात्र, यावेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनीच ह्या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी आवश्यक असलेले वार्षिक नियोजनही तातडीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लातुर, उस्मानाबाद,बार्शी-कुर्डवाडी या शहरांना पुणे-मुंबईशी जोडण्यासाठी लातुर ते टेंभुर्णी हा रस्ता फोर-लेन करण्यात यावा अशी मागणी लोकांमधून सातत्याने होत आहे. या अरुंद आणि खड्ड्यांच्या रस्त्यांवर आता पर्यंत अनेकांनी अपघातात आपला जीव गमावलेला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरच केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

इंधनाच्या जागी इथेनॅालचा वापर करा

पेट्रोल-डिझेलच्या ऐवजी आता इथेनॅालचा वापर ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या बायोमास पासून इथेनॅालची निर्मिती होते. बायोमास पासून सीएनजीही तयार होते. मात्र, याचे उत्पादन शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल होईल. काळानुरुप एवढा बदल होणे गरजेचे आहे की शहरात उदरनिर्वाहसाठी गेलेल्या तरुणांना त्यांच्या गावीच रोजगार मिळावा हीच माझी प्रमाणिक इच्छा असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

विज तोडणीचा ‘शॅाक’ शेतकऱ्यांना नाही परवडणार, सांगलीत मोर्चा तर औरंगाबादमध्ये आयुक्तांना निवेदन

Breaking : कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध, अमल महाडिकांचा उमेदवारी अर्ज मागे

नंदुरबार पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला, गुगल मॅपच्या मदतीने सराईत आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी जेरबंद

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.