वारी म्हणजे काय…कधीपासून सुरु झाली वारी, दिंडी अन् वारीत फरक तरी काय?
ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी. विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवताकडे जाणे म्हणजे वारी. घरुन निघायचे, एखाद्या संताच्या गावी जायाचे आणि त्या ठिकाणावरुन निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी. पंढरपूरला जाऊन विठ्ठूरायाचे दर्शन 'याची देही याची डोळा घेणे' म्हणजे वारी. 18 ते 20 दिवस सर्व संसारीक वैभव, सुख सोडून फक्त ईश्वराच्या धान्यात राहणारे वारकरी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहे.

वैष्णवांचा मेळा… भक्तांचा सागर…समानतेचा संदेश…कपाळावर टिळा… गळ्यात तुळशीची माळ अन् मुखाने हरिनाम असे दृश्य म्हणजे वारी. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी. महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारी. महाराष्ट्राचे वैभव म्हणजे वारी. संतांची शिकवण म्हणजे वारी. ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी. विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवताकडे जाणे म्हणजे वारी. घरुन निघायचे, एखाद्या संताच्या गावी जायाचे आणि त्या ठिकाणावरुन निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी. पंढरपूरला जाऊन विठ्ठूरायाचे दर्शन ‘याची देही याची डोळा घेणे’ म्हणजे वारी. 18 ते 20 दिवस सर्व संसारीक वैभव, सुख सोडून फक्त ईश्वराच्या धान्यात राहणारे वारकरी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहे. ही वारी कधी चुकायची नाही…असे म्हणणारे वैष्णव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. काय आहे ही वारी. कधी अन् कशी सुरु झाली वारीची परंपरा. वारी आणि दिंडीमधील फरक काय, राज्यभरातून किती दिंड्या निघतात…जाणून घेऊ या सर्व माहिती या महाराष्ट्रातील अनोख्या परंपरेची. ...