Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation : कोण आहे मनोज जरांगे पाटील, हॉटेलमध्ये काम केले, मराठा आंदोलनासाठी जमीन विकली

Maratha Reservation : मराठा समाजातील आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील यांचे नाव पुढे आले. त्यांनी थंड झालेले हे आंदोलन राज्यभर पसरवले. आंदोलनासाठी स्वत:ची जमीन विकणारे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण?

Maratha Reservation : कोण आहे मनोज जरांगे पाटील, हॉटेलमध्ये काम केले, मराठा आंदोलनासाठी जमीन विकली
manoj jarange patilImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 11:46 AM

जालना | 14 ऑक्टोंबर 2023 : मराठा समाजाचे आंदोलन पुन्हा एकदा पेटले. या आंदोलनामुळे महाराष्ट्राचे लक्ष जालना शहराकडे गेले. गेल्या काही दिवसांपासून जालना मराठा आंदोलनाचे केंद्र झाले आहे. मराठा आंदोलनास पुन्हा जिवंत करणारे मराठवाड्याला परिचित असणारे नाव आता महाराष्ट्रभर पसरले. ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. कधीकाळी उपजिविकेसाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम केले. मराठा आंदोलनासाठी त्यांनी स्वत:ची जमीन विकली. आता हे नाव राज्यातील घराघरापर्यंत गेले आहे.

मनोज जरांगे पाटील आहेत कुठले

मनोज जरांगे पाटील मुळचे बीड जिल्ह्यातील रहिवाशी. मोतोरी हे त्यांचे गाव. काही वर्षांपूर्वी त्यांनी बीडमधून जालनाकडे आपला मुक्कम हलवला. जालना जवळ असलेल्या अंबडमधील अंकुशनगरात ते स्थायिक झाले. त्यांच्या घरची परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे उपजिविकेसाठी त्यांनी एकेकाळी हॉटेलमध्ये काम केले. पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ते समाजात जाऊ लागले. चर्चा करु लागले. मग मराठा आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी स्वत:च्या जमीन विकली. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कित्येक मोर्चे काढले. आमरण उपोषणे केली. रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण मराठवाड्यात पसरले.

लाठीचार्जनंतर राज्याचे लक्ष वेधले

मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून उपोषण सुरु केले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी होती. तीन दिवस त्यांच्या उपोषणाकडे राज्याचे लक्ष गेले नाही. परंतु १ सप्टेंबर रोजी त्यांचे उपोषण सोडण्यासाठी बळाचा वापर झाला. यावेळी प्रचंड गोंधळ झाला. त्यावेळी लाठीचार्ज पोलिसांनी केला. अनेक जण जखमी झाले आणि राज्याचे लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर सभा घेतल्या. या सभानंतर १४ सप्टेंबर रोजी अंतरवली सराटीत सभेचं आयोजन केले.

हे सुद्धा वाचा

कधीकाळी काँग्रेसमध्ये आता समाजाचे नेतृत्व

मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे काम केले होते. परंतु राजकीय वातावरणात ते रमले नाही. मग त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. संघटनेचे काम वेगाने केले. कोपर्डी अत्याचार प्रकरणात आरोपीवर हल्ला झाला होता. त्यावेळी त्यांच्या शिवबा संघटनेवर आरोप झाले होते.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
'ते डबडं कुठं पुरून ठेवलंय...', औरंगजेब कबरीवरून जरांगेंची CM वर टीका
'ते डबडं कुठं पुरून ठेवलंय...', औरंगजेब कबरीवरून जरांगेंची CM वर टीका.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.