AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत राजन साळवी ? शिवसेनेचे लागोपाठ तीन वेळचे आमदार, पराभवाने ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेले

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काही मोजकेच आमदार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले होते. त्यापैकी राजन साळवी एक होते. त्यांच्यामागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ देखील लागले होते.

कोण आहेत राजन साळवी ? शिवसेनेचे लागोपाठ तीन वेळचे आमदार, पराभवाने ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेले
Follow us
| Updated on: Feb 13, 2025 | 6:01 PM

शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या राजापूर येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. राजन साळवी हे पराभूत झाल्याने पक्षनेतृत्वाविराधात नाराज झाले होते. त्यांनी मातोश्रीवरील बैठकीत आपल्या पराभवाला थेट शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनाच जबाबदार धरले होते. परंतू उद्धव ठाकरे यांनी तुम्ही म्हणताय म्हणून आणखी कोणाकोणाला काढायचे अशा आशयाचे वक्तव्य करीत त्यांच्यावर उलटा प्रश्न केला होता. त्यामुळे अखेर नाराज होत त्यांनी आणि भाजपात जायचा प्रयत्न केला. परंतू तेथून प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी सायंकाळी अखेर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मान्यता देत त्यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे.

राजापूरचे तीन वेळा आमदार झालेल्या राजन साळवी यांचा यंदा विधानसभेला पराभव झाला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केला.त्यामुळे बुधवारी त्यांनी ठाकरे यांच्याकडे उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. राजन साळवी यांनी ठाणे येथील आनंदमठात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

कोण आहेत राजन साळवी ?

राजन साळवी हे कोकणातील अस्सल मातीतील नेतृत्व असून शिवसेनेशी त्यांची नाळ १९९३-९४ च्या दरम्यान जुळली होती. रत्नागिरीच्या नगर परिषदेच्या इतिहासात ते पहिल्यांदा शिवसेनेचे महापौर बनले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत अनेक पदे भूषवली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीवार्द आणि तत्कालिन शिवसेना नेते नारायण राणे यांच्या पाठींब्याने ते रत्नागिरी जिल्हाप्रमुख देखील झाले. रत्नागिरी जिल्हाप्रमुख म्हणून  त्यांची कारकीर्द यशस्वी झाली.

हे सुद्धा वाचा

भारतीय विद्यार्थी सेनेतून काम सुरु

राजन साळवी यांची शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेना या विद्यार्थी संघटनेतून सुरुवात झाली होती. त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुख म्हणून उत्कृष्ट काम केले. साल २००४ मध्ये शिवतिर्थ येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा सन्मान केला होता.

पहिल्यांदा पराभव

राजापूर विधानसभा मतदार संघातील पोट निवडणूकीत त्यांचा साल २००६ मध्ये १,६०० इतक्या कमी मतांनी पराभव झाला होता. परंतू २००९ मध्ये राजापूर विधानसभा मतदार संघातून २५ हजार मतांनी विजयी झाले. त्यानंतर साल २०१४ मध्ये ते राजापूरातूनच ४० हजार मतांनी विजयी झाले. साल २०१९ मध्ये ते तिसऱ्यांदा शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. यंदा त्यांचा पराभव झाला.

यंदा विधानसभेत पराभव

राजन साळवी यांना २०११ च्या अणू प्रकल्प विरोधातील आंदोलनामुळे १९ दिवस तुरुंगात काढावे लागले. त्यांचा प्रवास एक शिवसेनेचा तळाचा कार्यकर्ता ते शिवसेनेचा नेता असा राहीला आहे. ते शिवसेनेचे तीन टर्म आमदार होते. परंतू तरीही त्यांना मंत्रीपद मिळाले नव्हते. महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर देखील ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत न जाता उद्धव ठाकरे यांच्या सोबत कायम राहीले. त्यांना ठाकरे यांनी ठाकरे गटाचा उपनेता केले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केला.

कोकणात मोठी गळती

रत्नागिरी जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारणरे मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, किरण सामंत असे तीन आमदार आहेत. कोकणात ठाकरे गटाकडे आता भास्कर जाधव हेच एकमेव आमदार उरले आहेत. विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने भास्कर जाधव नाराज आहेत. कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक सुद्धा लाचलुच प्रतिबंधक विभागाकडून कारवाईमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे असे नाराज नेते हेरण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे यांची शिवसेना करीत आहेत.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...