AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थकीत पगार आणि अन्य मागण्यांसाठी 72 दिवस आंदोलन, अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेले, पण…

विट्याच्या तहसील कार्यालयासमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकीत पगार आणि अन्य देणी मागण्यांसाठी गेल्या एक फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन सुरू आहे.

थकीत पगार आणि अन्य मागण्यांसाठी 72 दिवस आंदोलन, अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेले, पण...
Yashwant Sugar & PowerImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 9:17 AM

सांगली : यशवंत कारखान्याविरोधातील (Yashwant Sugar & Power) कामगार आंदोलकाचा मृत्यू झाल्याने त्याची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. आज ७५ वा दिवस होता असं सहकारी सांगत आहेत. विट्यात सलग 72 दिवस ऊन वारा पाऊस झेलत आंदोलनास बसलेल्या यशवंत साखर कामगारांपैकी एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू (Death of agitator) झाला. अमृत यशवंत लोंढे (वय 65) (Amrut yashwant londhe) असे त्यांचे नाव असून येथील एका खासगी रुग्णालयात दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु त्यांची तब्येत खालावत गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सहकारी सांगत आहेत.

विट्याच्या तहसील कार्यालयासमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकीत पगार आणि अन्य देणी मागण्यांसाठी गेल्या एक फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन सुरू आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी सन 2012 मध्ये कारखान्याचा लिलाव केला आणि आपले कर्ज फेडून घेतले.

त्यावेळी या लिलावातून मिळालेल्या पैशातून एक हजाराहून अधिक साखर कामगारांचे एकूण 8 कोटी 28 लाख रुपये जिल्हा बँकेकडून देणे आहे. जिल्हा बँक ह्या कामगारांचे पैसे गेले 20-12 वर्षे बिन व्याजी वापरत आहे. ते परत मिळावेत म्हणून 1 फेब्रुवारीपासून या कामगारांनी धरणे आंदोलन सुरु आहे. परवा गुरूवारी संध्याकाळी वाळूज येथील अमृत लोंढे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या सहकारी आंदोलकांनी त्यांना त्यांच्या विट्यातील मुलाच्या घरी पाठवले.

हे सुद्धा वाचा

पहाटे पुन्हा त्रास वाढल्याने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. अखेर लोंढे यांचा मृत्यू झाला. अमृत लोंढे यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पत्नीचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. जिल्हा बँकेकडून त्यांना वेळेत पैसे मिळाले असते तर तर त्या कुटुंबावर ही वेळ आली नसती अशी लोकं चर्चा करीत आहेत.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.