AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Kharat : यवतमाळातील पुसदमध्ये दलित समाजाला मारहाण, समाजकंटकांना अटक करा, दलितांना सुरक्षा देण्याची सचिन खरातांची मागणी

यवतमाळ जिल्ह्यातील कारला गावामध्ये दलित समाजानं बाबासाहेबांचं गाणं लग्नसमारंभात लावलं. याला विरोध करण्यासाठी काही समाजकंटकांनी दलित समाजाच्या लोकांना मारहाण केली. त्यानंतर दलित समाजावर बहिष्कार टाकल्याचं कळतंय.

Sachin Kharat : यवतमाळातील पुसदमध्ये दलित समाजाला मारहाण, समाजकंटकांना अटक करा, दलितांना सुरक्षा देण्याची सचिन खरातांची मागणी
समाजकंटकांना अटक करा, दलितांना सुरक्षा देण्याची सचिन खरातांची मागणी
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 10:57 PM

यवतमाळ : जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कारला या गावात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. दलित समाज बांधवांनी लग्नसमारंभमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी वाजवली. याला विरोध म्हणून दलित समाजाला समाजकंटकांनी जबर मारहाण केली. तसेच गावातील दलित समाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे असे समजते. आजही राज्यात डॉ. बाबासाहेब यांचे गाणं लावले म्हणून मारहाण करणे हे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या प्रकरणी लक्ष घालावे. समाजकंटकांना ॲट्रॉसिटी अंतर्गत अटक करून या दलित समाजाला सुरक्षा दयावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष करत आहे. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) राष्ट्रीय अध्यक्ष (National President) सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केली आहे.

कारल्यात नेमकं काय घडलं

यवतमाळ जिल्ह्यातील कारला गावामध्ये दलित समाजानं बाबासाहेबांचं गाणं लग्नसमारंभात लावलं. याला विरोध करण्यासाठी काही समाजकंटकांनी दलित समाजाच्या लोकांना मारहाण केली. त्यानंतर दलित समाजावर बहिष्कार टाकल्याचं कळतंय. या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) निषेध करत आहे. ज्या समाजकंटकांनी ही मारहाण केली त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीअंतर्गत कारवाई व्हावी. हे राज्य फुले, शाहू, आंबेडकरांचं राज्य आहे. या राज्यात अशी घटना घडणं अत्यंत निंदनीय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेकडं त्वरित लक्ष घालावं. मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून अटक करावी. दलित समाजाला पूर्णवेळ सुरक्षा द्यावी. अशी मागणी आरपीआय खरात पक्ष करत आहे. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेमागे कोण आहेत. याचा शोध पोलिसांनी घ्यावा. अशा प्रवृत्तींचा नाईनाट करावा, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश.
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.