Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal : यवतमाळमधील किडनीग्रस्त गावाची धक्कादायक कहाणी, जलशुद्धीकरण यंत्रणा दीड वर्षांपासून बंद, कधी जाग येणार?

हा गट ग्रामपंचायतीत सेवानगर बंजारा तांडा समाविष्ट आहे. गावची लोकसंख्या जवळपास सात हजार एवढी आहे. मात्र, हे गाव पाण्याची विपुलता असूनही फ्लोराईड क्षारयुक्त पाण्यामुळे शापित ठरले. सरकारी नोंदीनुसार या गावातील जवळपास40 किडनीग्रस्त रुग्ण दगावले.

Yavatmal : यवतमाळमधील किडनीग्रस्त गावाची धक्कादायक कहाणी, जलशुद्धीकरण यंत्रणा दीड वर्षांपासून बंद, कधी जाग येणार?
यवतमाळमधील किडनीग्रस्त गावाची धक्कादायक कहाणीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 11:41 PM

यवतमाळ : फ्लोराईड क्षारयुक्त अशुद्ध पेयजलामुळे (Water Issue) संपूर्ण महाराष्ट्रात किडनीग्रस्त (Kidney) गाव म्हणून महागाव तालुक्यातील वडदला ओळखलं जात आहे. माजीमंत्री मनोहर नाईक यांच्या निधीतून उभारण्यात आलेली वडद (ब्रह्मी) व सेवादासनगर येथील दोन जलशुद्धीकरण (Water Purification) यंत्रणा दीड वर्षांपासून बंद आहे. गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यांना किडनी आजाराच्या मरण यातना सहन करत जीवन जगावे लावत आहे. पुसद विधानसभासभा मतदारसंघातील वडद हे घनदाट जंगलाला लागून असलेले आदिवासीबहुल गाव आहे. हा गट ग्रामपंचायतीत सेवानगर बंजारा तांडा समाविष्ट आहे. गावची लोकसंख्या जवळपास सात हजार एवढी आहे. मात्र, हे गाव पाण्याची विपुलता असूनही फ्लोराईड क्षारयुक्त पाण्यामुळे शापित ठरले. सरकारी नोंदीनुसार या गावातील जवळपास40 किडनीग्रस्त रुग्ण दगावले.

पैसे मोजून पाणी आणायची वेळ

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी हा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न तत्कालीन मंत्री मनोहर नाईक यांच्यासमोर मांडला होता. त्यांनी तत्परतेने लक्षावधी रुपयांचा निधी आरओ यंत्रणा उभारण्यासाठी उपलब्ध करून दिला. यातून आरओ यंत्रणेतील सुविधा असलेले पहिले गाव वडद ठरले. ही आरओ यंत्रणा दुरुस्तीअभावी ठप्प झाली आहे. त्यामुळे पुन्हा फ्लोराईडयुक्त दूषित पाणी पिण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. सद्य:स्थितीत नागरिक दहा लिटरच्या कॅनला 20 रुपये मोजून ब्रह्मी गावातून पिण्याचे पाणी आणत आहेत.

प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम अर्धवटच

सरपंच स्वाती भारत पडघने यांनी सरपंच पदाचा प्रभार नव्याने हाती घेतल्यानंतर बंद पडलेली आरओ यंत्रणा सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. ही यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी ग्रामसेवकांनी परस्पर एजन्सीला काम दिलेले होते. प्रत्येकी तीन लाखांचे दोन धनादेश या एजन्सीला देण्यात आले. प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम अर्धवटच आहे. नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सरपंच स्वाती पडघने यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक नागरिकांना किडनीचे आजार

गावात शुद्ध पाणी नसल्याने अनेकांना किडनी आजार जडला आहे. पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जात नाही. आता पर्यंत40लोकांचा किडनी आजाराने मृत्यू झाला आहे. आरओ प्लांट बंद आहे. गावातील लोकांना किडनीचा आजार आहे. मलाही हाच त्रास आहे. पाण्यात क्षार आहे. भावाचा किडनी आजाराने मृत्यू झाला. जलशुद्धीकरण यंत्र बंद आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. गावात 70 टक्के रुग्ण गंभीर आहेत.

आरोग्य अधिकारी काय म्हणतात?

दोन पद्धतीने सहा महिन्याला पाण्याची तपासणी केली जाते. फ्लोराईडयुक्त पाण्याचे स्रोत आढळून आल्यास पाण्याची पर्यायी व्यवस्था केली जाते. गावात किडनीचे रुग्ण आढळून येते असल्यास तालुका आरोग्य अधिकारी यांची टीम पाठवण्यात येईल. किडनीच्या आजाराचा नेमका शोध घेण्यात येईल. मेडिकलमध्ये अथवा बोगस डॉक्टरकडे जाऊन कुणीही औषधी घेऊ नये. असे आवाहन जिल्हा आरोग अधिकारी यांनी केले आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.