AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local | …तरच मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करणार : इक्बाल चहल

मुंबईतील रुग्णवाढ थांबली, तरच मुंबई लोकल पुन्हा सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करणार, असे महापालिका आयुक्त इक्बाल चहल म्हणाले

Mumbai Local | ...तरच मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करणार : इक्बाल चहल
Follow us
| Updated on: Jul 26, 2020 | 11:40 AM

मुंबई : मुंबईची ‘लाईफलाईन’ फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच नाही, तर सर्वसामान्य प्रवाशांसाठीही सुरु केली जावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी मुंबई लोकल पुन्हा खुली करण्याची महत्त्वाची अट स्पष्ट केली आहे. (BMC Commissioner Iqbal Chahal on Mumbai Local Unlock)

मुंबईतील रुग्णवाढ थांबली, तरच मुंबई लोकल पुन्हा सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करणार, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी केलं आहे. मुंबईतील रुग्णसंख्या एक टक्क्यावर आली, तरच मुंबई अनलॉक होईल, असं चहल म्हणाले.

मुंबई शहरात नोकरी करणारे बहुसंख्य कर्मचारी मुंबईतील उपनगरे किंवा वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली अशा एमएमआर भागात राहतात. मात्र मुंबईसोबतच या भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मुंबईच्या महानगरी क्षेत्रातील रुग्णवाढ थांबवणे गरजेचे आहे, अन्यथा संसर्ग वाढत राहील, असेही इक्बाल चहल म्हणाले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

मुंबई लोकल येत्या ऑगस्टपासून सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. केंद्र सरकार याबाबत विचार करेल, हा विषय राज्य सरकारच्या अंतर्गत नाही, असे अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा : नालासोपारा स्टेशनवर प्रवाशांचा उद्रेक, रेल्वे रुळांवर उतरत लोकल अडवली

मुंबई लोकल 15 जूनपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा सुरु करण्यात आली. मात्र सर्वसामान्य प्रवाशांना यातून प्रवासाची मुभा अद्याप देण्यात आलेली नाही.

नालासोपारा परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा बुधवारी उद्रेक झाला होता. लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी करत रेल्वे स्थानकावर जमलेले अनेक प्रवासी रेल्वे रुळांवर उतरले होते.

नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय नागरिक राहतात. खाजगी कार्यालयामध्ये 15 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवर बोलावण्याची मुभा आहे. मात्र मुंबईत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहतूक व्यवस्थेची कार्यालयाकडून कोणतीही सोय झालेली नाही. बेस्टच्या अपुऱ्या बसेस, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल वाहतूक आणि नोकरीच्या ठिकाणी कामावर येण्यासाठी होणारा दबाव यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे बोलले जाते.

पहा व्हिडिओ :

(BMC Commissioner Iqbal Chahal on Mumbai Local Unlock)

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.