AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दरवर्षी मिळणार 400 अमृत भारत एक्सप्रेस, रेल्वेच्या कंपन्यांच्या या शेअरवर गुंतवणूकदारांची नजर

आधुनिक आणि वेगवान वंदेभारत एक्सप्रेसचे तिकीट दर जादा असल्याने रेल्वेने खास अमृत भारत ट्रेन आणल्या आहेत. अमृत भारत ट्रेन ही वंदेभारत सारख्याच सुविधा असणारी परंतू तिकीट दर माफक असणारी ट्रेन आहे. अमृत भारत एक्सप्रेस जिथे विद्युतीकरण झालेले नाही अशा भागात धावणार आहे. या ट्रेनचा वेग वाढण्यासाठी तिला 'पुश पुल' इंजिन जोडण्यात आले आहे.

दरवर्षी मिळणार 400 अमृत भारत एक्सप्रेस, रेल्वेच्या कंपन्यांच्या या शेअरवर गुंतवणूकदारांची नजर
amrit bharat expressImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 1:15 PM

मुंबई | 3 जानेवारी 2023 : वंदेभारत एक्सप्रेस या आधुनिक आणि वेगवान ट्रेनमुळे तिला चांगले यश मिळत आहे. आता 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून अमृत भारत एक्सप्रेसची भेट देखील दिली आहे. पंतप्रधानांनी एकाच वेळी दोन नवीन ट्रेनची भेट प्रवाशांनी दिली आहे. वंदेभारतचे तिकीट दर जादा असल्याने सर्वसामान्यांसाठी अमृत भारत ही कमी तिकीट दराची ट्रेन प्रवाशांना मिळाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्र सरकार दरवर्षी 300 ते 400 अमृत भारत एक्सप्रेस चालविणा असल्याचे म्हटले आहे. या रेल्वेच्या विविध कंपन्यांच्या स्टॉकमध्ये उसळी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या रेल्वे कंपन्यांच्या शेअरवर असणार खास नजर

अलिकडेच रेल्वेच्या विविध कंपन्यांनी शेअर बाजारात चांगली उसळी मारली आहे. आता सरकारतर्फे देशातंगर्त निर्मित वंदेभारत आणि अमृत भारत सारख्या ट्रेनच्या सहभागामुळे रेल्वे कंपन्यांच्या शेअरना चांगली मागणी वाढणार आहे. या कंपन्यामध्ये तितागढ रेल सिस्टीम्स, इरकॉन इंटरनॅशनल, आयएआरएफसी, रेल विकास निगम, बीईएमएल, रेलटेल, कंटेनर कॉर्प ऑफ इंडीया, आरआयटीईएस, आयआरसीटीसी आदी कंपन्यांचा समावेश आहे.

रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा वेग

गेल्या 9.5 वर्षांत रेल्वे नेटवर्कचा विस्तार 26 हजार किमी इतका झाला आहे. तसेच रेल्वेने 30,749 कोटी रुपये खर्च करून रेल्वे मार्गांचे दुपदरी करण केले असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. अमृत भारत स्टेशन प्रकल्पांतर्गत 400 रेल्वे स्थानकांचा पुर्विकास करण्यात येत आहे. या स्थानकात आधुनिक सुविधा आणि पार्किंगची सुविधा वाढविली जात आहे. अमृत भारत एक्सप्रेस एक स्लीपर क्लास ट्रेन आहे. या ट्रेनचे भाडे कमी असले तर सुविधा वंदेभारत सारख्या देण्यात आल्या आहेत. या ट्रेनमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, जादा वेग आणि आरामदायी प्रवासाच्या सुविधा आहेत. या ट्रेनमुळे केवळ प्रवाशांच्या वेळेतच बचत होत नाही तर बाहेरील आवाज आणि हवा देखील कमी आत येते असे म्हटले जाते.

 9 वर्षांत काय बदल केला

नरेंद्र मोदी सरकारने नऊ वर्षांत खूप बदल केला आहे. आधुनिक ट्रेनशिवाय नवीन ट्रॅक टाकणे, स्थानकांचे नुतनीकरण, रेल्वे मार्गांचे नुतनीकरण वेगाने होत आहे. रेल्वेने 14 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात 100 टक्के इलेक्ट्रीफिकेशचे ध्यैयाचे लक्ष्य 31 मार्च 2023 पर्यंत गाठले आहे. यामुळे भारताचा आयातीवरचे पैसे वाचतील आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होईल असे म्हटले जाते.

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.