Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगभरात भारताचा विकास दर सर्वाधिक, अमेरिकन अब्बाधीश उद्योगपतीचा विश्वास

जागतिक राजकारणात भारत हा निष्पक्ष देश आहे. भारताच्या या भूमिकेचा त्यांना फायदा होणार आहे. जगभरात भारताचा विकास दर सर्वाधिक असणार आहे.

जगभरात भारताचा विकास दर सर्वाधिक, अमेरिकन अब्बाधीश उद्योगपतीचा विश्वास
भारताचा विकास दर वाढणार
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 9:11 AM

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात जगभरात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. सर्व जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. अमेरिकन अब्जाधीश रे डॅलिओ (Ray Dalio) यांनी भारतासंदर्भात मोठे विधान केले आहे. जगभरात भारताचा विकास दर इतर देशांच्या तुलनेत सर्वात चांगला असणार आहे, असे वक्तव्य रे डॅलिओ यांनी केले आहे. दुबईत वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दरम्यान ते बोलत होते. सरकार आणि बदलते जग या सत्रात त्यांनी हे वक्तव्य केले असल्याचे गल्फ न्यूजने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. डॅलियो ब्रिजवॉटर असोसिएट्सचे संस्थापक आहेत.

युद्धापासून दूर राहणार्‍या देशांना फायदा

डॅलियो पुढे म्हणाले की, भारताचे भविष्य उज्ज्वल आहे. मागील दहा वर्षांपासून मी अभ्यास करत आहे. त्यानुसार आपण जे पाहत आहोत, त्यात भारताचा विकास दर सर्वाधिक आणि वेगवान असणार आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत देशात सर्वात मोठा बदल होणार आहे.

जागतिक राजकारणात भारत हा निष्पक्ष देश आहे. भारताच्या या भूमिकेचा त्यांना फायदा होणार आहे. जगभरात भारताचा विकास दर सर्वाधिक असणार आहे. युएईचे कॅबिनेट मंत्री मोहम्मद बिन अब्दुल्ला अल गेर्गावी यांच्याशी बोलताना ते म्हणाले जे देश युद्धापासून दूर राहतील त्यांना फायदा होईल.

भारताची परिस्थिती चांगली

अमेरिकन अब्जाधीश डॅलियो पुढे म्हणाले की, भारताची परिस्थिती खूपच चांगली आहे. येथे व्यवसायासाठी खूप चांगले आणि सोपे वातावरण नाही, परंतु त्यात बदल होईल. युरोपबद्दल विचारले असता ते म्हणाले की, हे पर्यटन आणि येथील सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी चांगले ठिकाण आहे.

अर्थसंकल्पात काय म्हटले होते

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. त्यात भरताचा विकास दर ६.५ टक्के असेल असे नमूद केले आहे. यापूर्वी, आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल यांनी भारत अनेक वर्षांपर्यंत नऊ टक्के आर्थिक विकास दर गाठू शकतो, असे म्हटले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.