देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपमध्ये मोठी जबाबदारी, राज्याचा नाही तर देशाचा गाडा हाकणार?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी काही नावांवर चर्चा झाली. त्यात महाराष्ट्रातून दोन नावे होती. विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आले होते. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावे किंवा पक्षाध्यक्ष करावे, अशी चर्चा पक्षात झाली.
भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षात लवकरच मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा मोदी 3.0 मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर त्यांच्या जागी नवीन राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरु होतो. आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्याला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्ष केले तरी महाराष्ट्र विधानसभेची जबाबदारी त्यांच्याकडेच असणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर का दिली जाणार जबाबदारी
राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे आहे. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आहे. तसेच संघाचे मुख्यालय असलेले नागपूरमधील ते आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर संघाचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस येतात. पक्षावर त्यांची मजबूत पकड आहे. अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यापूर्वी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली जात आहे.
या नावांवर होती चर्चा
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी काही नावांवर चर्चा झाली. त्यात महाराष्ट्रातून दोन नावे होती. विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आले होते. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावे किंवा पक्षाध्यक्ष करावे, अशी चर्चा पक्षात झाली. परंतु संघाने फडणवीस यांना पक्षाध्यक्ष करण्यास अनुकूलता दर्शवली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यांची पत्नी आणि मुलगीसोबत होती.
मोदींसोबत सहपरिवार भेट
फडणवीस यांनी नुकतीच नवी दिल्लीत सहपरिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाली तरी आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची महत्वाची जबाबदारी असणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले नसले तरी विधानसभेचे रण जिंकण्यात फडणवीसच महत्वाची भूमिका बजावू शकतात, असे पक्षातील चाणक्यांचे म्हणणे आहे.