नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, या वर्षात आतापर्यंत 189 नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या दंतेवाडा-नारायणपूर सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये जवळपास ३० नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिसांशी झालेल्या चकमकीत आतापर्यंत 32 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून AK-47 रायफल, SLR आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, या वर्षात आतापर्यंत 189 नक्षलवादी ठार
Follow us
| Updated on: Oct 04, 2024 | 9:20 PM

छत्तीसगडमध्ये पोलीस दलाला मोठं यश आलं आहे. नारायणपूरमध्ये चकमकीत सुरक्षा दलाने 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या नक्षलवाद्यांची पोलीस ओळख पटवत आहेत. यावेळी नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रांचा साठाही जप्त करण्यात आला आहे. नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून नारायणपूर पोलीस आणि दंतेवाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी झालेल्या चकमकीत  30 नक्षलवादी ठार झाले आहेत.

डीआरजी आणि एसटीएफकडून कारवाई

नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरील थुलथुली गावाच्या जंगलात पोलिसांनी ही कारवाई केली. अशी बस्तर विभागाचे आयजी यांनी दिली आहे. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यातून सुरक्षा दलांची तुकडी पाठवण्यात आली होती. त्यात जिल्हा राखीव रक्षक आणि एसटीएफचे जवान देखील होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुपारी एकच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. यानंतर जवानांनी जबाबदारी घेतली आणि २४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्याकडून  एके-47 आणि एसएलआर आणि इतर शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत सर्व जवान सुरक्षित आहेतक. परिसरात अधूनमधून गोळीबार सुरू आहे.

या वर्षात आतापर्यंत 189 नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या कारवाईत आतापर्यंत शेकडो नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. ज्या नक्षलवाद्यांना यातून बाहेर यायचं आहे त्यांना विशेष ऑपरेशन अंतर्गत परत येण्याची संधी दिली जात आहे. पण तरी देखील जे नक्षलवाद सोडत नाहीत आणि शांतता प्रस्थापित होऊ देत नाही त्यांचा खात्मा केला जात आहे.

दंतेवाडा आणि नारायणपूरसह सात जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत 189 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. वेगवेगळ्या चकमकीत त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शुक्रवारी थुलाथुली गावच्या जंगलात ठार झालेल्या नक्षलवाद्यांचाही समावेश आहे.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.