AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : 30 जानेवारी ते 28 एप्रिल, भारतात कसा वाढला कोरोनाचा कहर?

24 तासात देशभरात 1,543 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सध्या 29,435 वर पोहोचला आहे. ही संख्या चिंताजनक आहे.

Corona : 30 जानेवारी ते 28 एप्रिल, भारतात कसा वाढला कोरोनाचा कहर?
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 5:59 PM

मुंबई : देशात कोरोनाचं थैमान सुरुच आहे(Corona Virus Update In India). गेल्या 24 तासात देशभरात 1,543 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सध्या 29,435 वर पोहोचला आहे. ही संख्या चिंताजनक आहे. यापैकी 6,865 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर देशात सध्या 21,631 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात 30 जानेवारीला भारतात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता(Corona Virus Update).

30 जानेवारीपासून ते आजपर्यंत देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही 29,435 वर पोहोचली आहे. तर देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे 6 हजार 169 रुग्ण आहेत. मात्र, भारतात एक रुग्ण ते 29,435 कोरोना रुग्ण हा आकडा इतका कसा वाढला. देशात सर्व खबरदारी घेऊनही लॉकडाऊन घोषित करुनही कोरोनाचा कहर भारतात वाढतच गेला, तो कसा आणि किती पटीने वाढला त्याचा हा आढावा.

भारतात कसा वाढला कोरोनाचा कहर?

किती दिवसांमध्ये किती कोरोनाबाधित रुग्णकालावधी बाधितांची संख्या
45 दिवसात 10030 जानेवारी ते 14 मार्च 102
16 दिवसात 100015 मार्च ते 29 मार्च1,139
11 दिवसात 500030 मार्च ते 9 एप्रिल6,728
11 दिवसात 10,0008 एप्रिल से 19 एप्रिल17,305
9 दिवसात 13,11920 एप्रिल से 28 एप्रिल 30,424

सर्वाधिक कोरोनाबाधित ठरलेले पाच दिवस कोणते?

दिवसकोरोना बाधित
23 एप्रिल 1667
25 एप्रिल 1835
26 एप्रिल 1607
27 एप्रिल 1561
28 एप्रिल 1903

Corona Virus Update In India

सर्वाधिक जीवघेणे ठरलेले 5 दिवस कोणते?

  
23 एप्रिल 44
24 एप्रिल 57
25 एप्रिल 37
26 एप्रिल 60
27 एप्रिल 54
28 एप्रिल 71

एक महिन्यानंतर भारतात 22 हजार कोरोनाबाधित रुग्ण वाढले. चीनमध्ये एक महिन्यानंतर 75 हजाराने, तर इटलीत सव्वा लाखाने कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती.

देश लॉकडाऊनचा पहिला दिवस बाधित/मृत्यूलॉकडाऊनचा 30वा दिवस बाधित/मृत्यू
भारत657 / 1223,039 / 721
चीन830 / 2576,288 / 2,345
इटली9,172 / 4631,35000 / 17,127

देशात 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण नाही

देशभरातील 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. तर देशातील 16 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. याशिवाय कोरोनावर मात करणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण आता 22.17 टक्क्यांवर आलं आहे, अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

Corona Virus Update In India

संबंधित बातम्या :

आयटी कंपन्यांना 31 जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सूट, केंद्राची मोठी घोषणा

देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 22.17 टक्क्यांवर, 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण नाही

घराच्या ओढीने तरुणाचा 1700 किमी सायकलने प्रवास, सांगलीहून सात दिवसात ओदिशा गाठलं

पैशांचा तुटवडा, किडनी आणि लिव्हरचे उपचार परवडेना, राहुल गांधी 1,000 रुग्णांची जबाबदारी घेणार

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.