AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअरस्ट्राईक दरम्यान मुलाचा जन्म, नाव ठेवलं ‘मिराज सिंह’

जयपूर : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या बालाकोट दहशतवादी तळावर बॉम्ब हल्ला केला. भारतीय सैन्याने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानला चोख असं उत्तर दिलं. या हल्ल्यानंतर भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. प्रत्येक ठिकाणी रस्त्या-रस्त्यावर ‘भारत माती की जय’चे नारे दिले जात आहेत, तर कुठे मिठाई आणि फटाके फोडून आनंद साजरा केला जात आहे. […]

एअरस्ट्राईक दरम्यान मुलाचा जन्म, नाव ठेवलं ‘मिराज सिंह’
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

जयपूर : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या बालाकोट दहशतवादी तळावर बॉम्ब हल्ला केला. भारतीय सैन्याने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानला चोख असं उत्तर दिलं. या हल्ल्यानंतर भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. प्रत्येक ठिकाणी रस्त्या-रस्त्यावर ‘भारत माती की जय’चे नारे दिले जात आहेत, तर कुठे मिठाई आणि फटाके फोडून आनंद साजरा केला जात आहे. याच दरम्यान राजस्थानच्या सैनिक कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला आहे. त्याचे नाव मिराज सिंह असं ठेवण्यात आलं आहे.

राजस्थानच्या निगौर जिल्ह्यातील डाबडा गावात राहणाऱ्या महावीर सिंह यांची पत्नी सोनम यांना प्रसूती वेदनेनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. त्याचा जन्म अशा वेळी झाला ज्यावेळी भारतीय वायूसेनेने पाकिस्तानवर हल्ला केला. त्यामुळे या मुलाचे नाव मिराज सिंह असे ठेवण्यात आलं आहे. सध्या या बाळाच्या नावावरुन संपूर्ण देशभर चर्चा सुरु आहे.

हे वाचा : पाकवर बॉम्ब टाकणारं ‘मिराज 2000’ नेमकं काय आहे?

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर जोरदार बॉम्ब हल्ला केला. या एअरस्ट्राईकमध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या सर्व हल्ल्यात वायूसेनेच्या 12 विमानांनी उत्तम कामगिरी केली आहे. या विमानांनी पाकिस्तानवर बॉम्ब हल्ला केला आणि लेझर गाईड बॉम्ब टाकले. या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

व्हिडीओ : दोन दहशतवाद्यांचा खात्मा, काश्मीरच्या शोपियांमध्ये भारतीय जवानांची मोठी कारवाई

भारत सरकारचा तुर्कीला मोठा दणका; 9 विमानतळांवरची सुरक्षा परवानगी रद्द
भारत सरकारचा तुर्कीला मोठा दणका; 9 विमानतळांवरची सुरक्षा परवानगी रद्द.
मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त म्हणून.. ; राऊतांचा विरोधकांना टोला
मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त म्हणून.. ; राऊतांचा विरोधकांना टोला.
भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीला मुदतवाढ दिली
भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीला मुदतवाढ दिली.
उपकाराची जाणीव मोदींनी किती ठेवली?, राऊतांचे खळबळजनक दावे, गौप्यस्फोट
उपकाराची जाणीव मोदींनी किती ठेवली?, राऊतांचे खळबळजनक दावे, गौप्यस्फोट.
‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.