AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Afzal Ansari | बसपा खासदार अफजाल अन्सारी यांना 4 वर्षांची शिक्षा, नक्की कारण काय?

अखेर न्यायालयाने या खासदाराला दोषी ठरवत मोठी कारवाई केली आहे. न्यायालयाने या खासदाराला 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जाणून घ्या नक्की प्रकरण.

Afzal Ansari | बसपा खासदार अफजाल अन्सारी यांना 4 वर्षांची शिक्षा, नक्की कारण काय?
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 5:28 PM

लखनऊ | राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी आली आहे. एका प्रकरणात खासदाराला 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. यामुळे या खासदाराला मोठा झटका लागला आहे. इतकंच नाही, तर शिक्षा सुनावल्याने संसदेचं सदस्यत्व म्हणजेच खासदारीकी गमवावी लागण्याची शक्यता आहे. हे नक्की प्रकरण काय आहे आणि कारवाई झालेल्या खासदाराचं नाव आपण सविस्तर जाणून घेऊयात.

गँगस्टर केसमध्ये गाजीपूर एमपी-एमएलए न्यायालयाने बसपा खासदार अफजाल अन्सारी यांना दोषी ठरवलंय. तसेच 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आता अन्सारी यांना संसदेचं सदस्यत्वही गमवावं लागू शकतं. याआधी अफजाल यांचे बंधू मुख्तार अन्सारी यांना 10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. कृष्णानंद राय हत्या प्रकरणात या दोन्ही बंधूना दोषी ठरवण्यात आलं आहे. शिक्षा सुनावल्यानंतर या दोघांनाही कारागृहात नेण्यात आलं. अफजाल हे बहुजन समाज पक्षाचे गाजीपूर लोकसभा मतदार संघातून खासदार आहे. तर मुख्तार अन्सारी शेजारील जिल्ह्यातील मउ विधानसभा मतदारसंघातून सलग 5 वेळा आमदार राहिले आहेत.

नियमांनुसार कोणत्याही खासदाराला 2 पेक्षा अधिक वर्षांची शिक्षा होते, तेव्हा त्याला संसदेचं सदस्यत्व गमवावं लागतं. कृष्णानंद राय हे मोहम्मदाबाद विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तत्कालिन आमदार होते. कृष्णानंद राय आणि त्याच्यांसह 7 जणांवर 29 नोव्हेंबर 2005 मध्ये फायरिंग करण्यात आली होती.

तत्कालिन आमदार कृष्णानंद राय हे 29 नोव्हेंबर 2005 रोजी क्रिकेट सामन्याचं उद्घाटन करुन परतत होते. यावेळेस मुख्तार अन्सारी टोळीच्या कार्यकर्त्यांनी बसनिया चटीजवळ गोळीबार करून आमदार कृष्णानंद राय यांच्यासह सात जणांची हत्या केली. या प्रकरणात कुख्यात गुन्हेगार मुन्ना बजरंगीचे नाव पुढे आले होते. काही वर्षांपूर्वी मुन्ना बजरंगीची तुरुंगात हत्या झाली होती. या प्रकरणात अन्सारी बंधूना आरोपी ठरवण्यात आलं होतं.

या हत्येप्रकरणी 22 नोव्हेंबर 2007 रोजी गाझीपूर जिल्ह्यातील मोहम्मदाबाद कोतवाली इथे गँगस्टर चार्टमध्ये खासदार अफजल अन्सारी आणि मुख्तार अन्सारी यांच्यावर गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 23 सप्टेंबर 2022 रोजी दोघांविरुद्ध प्रथमदर्शनी आरोप निश्चित करण्यात आले. फिर्यादीची साक्ष पूर्ण झाली.

त्यानंतर 1 एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणात आधी 15 एप्रिल रोजी निकाल येणार होता. मात्र त्यानंतर तो निकाल 22 एप्रिल रोजी सुनावण्यात येणार होता. दरम्यान आता अफजाल अन्सारी यांच्या संसदेच्या सदस्यत्वाबाबत काय आणि केव्हा निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.