AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mission Suryayaan : चंद्रावर जाण्यासाठी 40 दिवस लागले, तर सूर्यापर्यंत जाण्यास किती वेळ लागणार ? काय आहे ISRO ची योजना

चंद्र आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3 लाख 84 हजार 400 किमी इतके आहे. चंद्रयान-3 ला चंद्रावर जाण्यासाठी 40 दिवसांचा प्रवास करावा लागला आहे. तर सुर्ययान किती दिवस घेणार ?

Mission Suryayaan : चंद्रावर जाण्यासाठी 40 दिवस लागले, तर सूर्यापर्यंत जाण्यास किती वेळ लागणार ? काय आहे ISRO ची योजना
Aditya -L 1Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 1:13 PM

नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करुन नवा इतिहास रचल्याने अंतराळ क्षेत्रात भारताची वाहवा केली जात आहे. भारताने अत्यंक कमी खर्चात हे यश मिळविल्याने त्याचे कौतूक होणे योग्य आहे. आता चंद्रयान-3 मोहीमेच्या यशानंतर भारत सूर्यावर यान पाठविण्याची तयारी करीत आहे. सूर्यावर आदित्य एल-1 हे यान पाठविण्यात येणार आहे. येत्या 2 सप्टेंबर रोजी हे सूर्ययान पृथ्वीवरुन रवाना होणार आहे. चंद्रावर जाण्यासाठी 40 दिवस लागले तर सूर्यावर जाण्यास किती दिवस लागतील याची चर्चा सुरु आहे. त्यावर इस्रोने स्पष्टीकरण दिले आहे.

चंद्र आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3 लाख 84 हजार 400 किमी इतके आहे. चंद्रयान-3 ला चंद्रावर जाण्यासाठी 40 दिवसांचा प्रवास करावा लागला आहे. तर सूर्याचं पृथ्वीपासूनचे अंतर 15 लाख किलोमीटर आहे. भारताचे आदित्य एल-1 हे सूर्ययान सूर्याजवळ जाण्यासाठी नेमका किती वेळ लागणार आहे. सूर्य हा तत्प तारा आहे. त्याचे तापमान प्रचंड मोठे आहे. इतक्या दूर असून आपल्याला या तापमानाच्या झळा सहन होत नाहीत. परंतू सूर्ययान सूर्याजवळ जाऊन त्याचा अभ्यास करणार आहे. काय म्हटले आहे इस्रोने पाहूयात..

आदित्य नाव का  दिले ?

भारताची महत्वाकांक्षी सूर्ययान मोहीमेत आदित्य एल-1 हे यान सूर्याजवळ 110 दिवसात पोहचणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. चंद्र मोहीमेचे नाव चंद्रयान असे तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ठेवले होते. आता सुर्यावरील मोहीमेचे नाव आदित्य एल-1 असे नाव दिले आहे. आदित्या सूर्याचे एक नाव आहे. इस्रोचे सूर्ययान सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 6000 अंश सेल्सिअस आणि गाभ्याचे 1, 60,000 अंश सेल्सिअस इतके आहे. पाहाता त्यावर उतरू शकत नाही. आदित्य एल-1 यान सुर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान हालो ऑर्बिटमध्ये लॅगरेंज पॉईंट – 1 येथून सुर्याचा अभ्यास करणार आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत हा अभ्यास होणार आहे. यासाठी त्यास एल-1 असा शब्द जोडला आहे.

आदित्य एल-1 मोहीमेचे उद्दीष्ट काय ?

इस्रोने म्हटले आहे की आदित्य एल- 1 मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठी तेथे होणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी पाठविले जात आहे. सूर्यावरील घडामोडींचा पृथ्वी आणि इतर ग्रहांवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला जाणार आहे. आदित्य एल-1 सूर्याच्या फोटोस्फीयर, क्रोमोस्फीयर, सूर्याभोवतीच्या कोरोनावर नजर ठेवेल. तसेच आजूबाजूच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक कणांचा आणि चुंबकीय क्षेत्र अभ्यास करणार आहे.

भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.