AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India, China Dispute : ‘एलएसी’वर आज भारत-चीनमध्ये कमांडर स्तरावरील बैठकीची 16 वी फेरी

आज भारत आणि चीनी लष्करी अधिकाऱ्यांमधील चर्चेच्या 16 व्या फेरीला सुरुवात झाली आहे. आजच्या या बैठकीमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत (Line of Actual Control) अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

India, China Dispute : 'एलएसी'वर आज भारत-चीनमध्ये कमांडर स्तरावरील बैठकीची 16 वी फेरी
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 3:05 PM

नवी दिल्ली: भारत आणि चीनमध्ये संघर्ष सुरूच आहे. अनेकदा पूर्व लडाखच्या (Eastern Ladakh) मुद्द्यावरून भारत -चीनचे सैन्य आमने-सामने (China India Border Dispute) आल्याचे पहायला मिळाले. मात्र आता हा वाद चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि चीनी लष्कारातील उच्चस्थरीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या 15 फेऱ्या झाल्या आहेत.या 15 फेऱ्यांमध्ये काही भागांवरील वाद मिटवण्यात यश आले आहे. मात्र अद्यापही काही भागातील वाद सुटला नसल्याने चर्चेचे सत्र सुरूच आहे. आज भारत आणि चीनी लष्करी अधिकाऱ्यांमधील चर्चेच्या 16 व्या फेरीला सुरुवात झाली आहे. आजच्या या बैठकीमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत (Line of Actual Control) उर्वरीत मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये देखील काही मुद्दे निकाली निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

11 मार्च रोजी झाली होती 15 वी फेरी

सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार ही बैठक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजुवरील चोशुल मोल्डो मीटिंग पॉईंटवर सुरू आहे. आज भारत आणि चीनी सौनिकांमध्ये सुरू असलेल्या या बैठकीमध्ये अनेक महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच भारत चीनला ज्या जागांबाबत दोन्ही देशांमध्ये वाद आहे. त्या जागेवरील सैन्य माघारी घेण्यास सांगण्याची शक्यता आहे. यापूर्वी दोन्ही देशात शेवटची बैठक ही 11 मार्च रोजी झाली होती. आतापर्यंत चीन आणि भारतादरम्यान अशा चर्चेच्या एकूण 15 फेऱ्या झाल्या आहेत. या चर्चेमधून अनेक विषयांवर तोडगा काढण्यात यश मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

जयशंकर यांची चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांसोबत चर्चा

दरम्यान यापूर्वी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सात जुलै रोजी चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांच्यासोबत चर्चा केली होती. या बैठकीमध्ये पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीबाबत चर्चा करण्यता आली. तसेच जी 20 देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत देखील जयशंकर यांनी पूर्व लडाखचा मुद्दा उपस्थित करत तिथे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते.

शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा.
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री.
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक
नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा आहात; मोदींकडून जवानांचं कौतुक.
दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी - मोदी
दहशतवाद्यांच्या आकांना समजलं असेल भारताकडे नजर म्हणजे बर्बादी - मोदी.
मोदींनी आदमपूर एअरबेसबाबत पाकच्या खोट्या दाव्यांचा बुरखा टराटरा फाडला
मोदींनी आदमपूर एअरबेसबाबत पाकच्या खोट्या दाव्यांचा बुरखा टराटरा फाडला.