AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ISRO : अंतराळात सुपरपॉवर बनणार भारत, साल 2030 पर्यंत अंतराळ स्थानक तयार करणार

इस्रो साल 2030 पर्यंत आपले पहिले स्पेस स्टेशन लॉंच करणार आहे. स्पेस स्टेशन म्हणजे अंतराळातील अंतराळवीरांना मुक्काम करता येण्यासारखी एक मोठी प्रयोगशाळाच असणार आहे.

ISRO : अंतराळात सुपरपॉवर बनणार भारत, साल 2030 पर्यंत अंतराळ स्थानक तयार करणार
space stationImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 8:26 PM

नवी दिल्ली | 11 सप्टेंबर 2023 : चंद्रयान-3 च्या ऐतिहासिक यशानंतर भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने ( ISRO ) आपली नविन क्रांतिकारक योजना हाती घेतली आहे. भारत अंतराळात स्वत:चे स्पेस स्टेशन स्थापन करण्याची तयारी करीत आहे. अमेरिका आणि चीन यांच्या नंतर अंतराळात स्वत:चे स्पेस स्टेशन स्थापन करणारा भारत तिसरा देश ठरणार आहे. भारताचे स्पेस स्टेशन हे अमेरिका आणि चीनच्या अंतराळ स्थानकाच्या तुलनेत एकदम खास असणार आहे. साल 2030 पर्यंत भारताचे स्वत: चे अंतराळ स्थानक असणार आहे.

स्पेस स्टेशन म्हणजे काय ?

स्पेस स्टेशन म्हणजे अंतराळातील अंतराळवीरांना मुक्काम करता येण्यासारखी एक मोठी प्रयोगशाळाच असते. अंतराळात जाणारे अंतराळवीर या स्पेस स्टेशनवर जाऊन संशोधन करीत असतात. स्पेस स्टेशन पृथ्वीची प्रदक्षिणा घालत असते. अंतराळवीर स्पेस स्टेशनवर साधारण सहा महिन्यांच्या मुक्कामासाठी जातात. एका वेळी अंतराळ स्थानकात सहा ते सात अंतराळवीर रहात असतात. ते पुन्हा परतल्यानंतर दुसरी तुकडी पाठविली जाते. आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरला पंधरा देशांनी मिळून तयार केले आहे.

कसे असेल भारताचे स्पेस स्टेशन ?

इस्रोच्या शास्रज्ञांनी सांगितलेल्या माहितीनूसार भारताचे स्पेस स्टेशन 20 टन वजनाचे असेल. तर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचे वजन 450 टन आहे. तर चीनच्या स्पेस स्टेशनचे वजन 80 टन इतके आहे. इस्रोने म्हटले आहे की भारतीय स्पेस स्टेशन सेंटरमध्ये एका वेळी चार ते पाच अंतराळवीर राहू शकणार आहे. भारतीय स्पेस स्टेशनला पृथ्वीच्या सर्वात खालच्या ऑर्बिटमध्ये ठेवले जाणार आहे. या ऑर्बिटला LEO म्हटले जाते. ही कक्षा पृथ्वीपासून 400 किमी दूर असते.

गगनयान मिशन लॉंच

साल 2019 मध्ये इस्रोचे तत्कालिन प्रमुख के. सिवन यांनी मिडीयाशी बोलताना सांगितले होते की इस्रो गगनयान मोहिमेनंतर साल 2023 पर्यंत आपले स्वत:चे स्पेश स्टेशन लॉंच करेल. गगनयान मोहिमेला याची पहिली पायरी म्हटले जात आहे. इस्रो पुढच्या वर्षी मानव रहीत गगनयान मिशन लॉंच करणार आहे. जेथे गगनयान मोहिमे राबविली जाणार आहे. तेथेच इस्रो आपले स्पेस स्टेशन स्थापन करणार आहे. अलिकडेच केंद्र सरकारने इस्रोच्या या योजनेसाठी निधी दिला आहे.

नासा आणि इस्रोमध्ये करार

जी-20 परिषदमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मिडीयाशी बोलताना सांगितले की भारत आणि अमेरिका अंतराळात एकत्र भागीदारीत एकमेकांच्या योजनांना मदत करतील. इस्रोने सांगितले की अमेरिकन स्पेस एजन्सी नासा भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देईल. यासाठी नासा आणि इस्रोमध्ये करार झाला आहे. गगनयान मोहिमेत अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांचे ह्युस्टन स्थित जॉनसन स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.