Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचे मोफत कार्ड

कर्नाटकात सध्या भाजपचे सरकार आहे. अशा स्थितीत काँग्रेस यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनतेला तीन आश्वासने दिली आहेत.

कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचे मोफत कार्ड
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 2:07 PM

बेंगळुरु : कर्नाटकमध्ये काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका (karnataka assembly election) होणार आहेत. राज्यातील सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा पुनरागमन करण्याच्या प्रयत्न करत आहे. त्याचवेळी काँग्रेसनेही निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी मोफत योजनेचे कार्ड काढले आहे. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सांगितले की, पक्षाने निवडणुकीसंदर्भात तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोफत तांदूळ, मोफत वीज अन् दर महिन्याला दोन हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. आता या घोषणा काँग्रेसला विजयापर्यंत नेतील का? हे भविष्यातच स्पष्ट होणार आहे.

10 किलो तांदूळ मोफत 

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष शिवकुमार म्हणाले की, काँग्रेसने बीपीएल कार्डधारकांना 10 किलो तांदूळ मोफत देण्याचे तिसरे वचन जाहीर केले आहे. यापुर्वी दरमहा २०० युनिट मोफत वीज देण्याची आणि राज्यातील प्रत्येक कुटुंबप्रमुखाला दरमहा २०० रुपये देण्याची दोन आश्वासने दिली होती.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस वाटणार गँरंटी कार्ड

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस गँरंटी कार्डचे वाटप करणार आहे. काँग्रेस या कार्डमध्ये लोकांना मोफत वीज आणि महिलांना दरमहा 2000 रुपये देण्याचे आश्वासन देत आहे. साहजिकच काँग्रेस कर्नाटकात मोफत रेवड्याच्या राजकारणावर काँग्रेस काम करत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या या रेवड्या चालल्या नव्हत्या.

कर्नाटकात सध्या भाजपचे सरकार आहे. अशा स्थितीत काँग्रेस यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनतेला तीन आश्वासने दिली आहेत.

मोदी यांच्या सभा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा अजून झालेली नाही. परंतु भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांपासून पक्षाचे अनेक प्रमुख नेते व केंद्रीय मंत्री कर्नाटकात येणार आहे. १ मार्चपासून भाजपकडून चार विजय संकल्प रथयात्रा काढण्यात येणार आहे. राज्याच्या चारही दिशांमधून काढण्यात येणाऱ्या या रथयात्रेत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणांहून या रथयात्रांना हिरवा झेंडा दाखवतील.

'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र.
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्.
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास.
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.