Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटक निवडणुकीत लिंगायत समाजाचे काय आहे महत्व, कोणाकडे जाणार हा समाज

राज्यातील राजकीय, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वात शक्तिशाली लिंगायत समाज आहे. हा समाज गेल्या 100 वर्षांपासून काँग्रेसशी जुळलेला आहे.

कर्नाटक निवडणुकीत लिंगायत समाजाचे काय आहे महत्व, कोणाकडे जाणार हा समाज
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 6:04 PM

बेंगळुरु : कर्नाटकमध्ये काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका (karnataka assembly election) होणार आहेत. राज्यातील सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा पुनरागमन करण्याच्या प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस आणि जेडीएस सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. कर्नाटकात सत्ता मिळवण्यासाठी लिंगायत समाजाचे महत्व खूप मोठे आहे. कर्नाटकात प्रभावशाली लिंगायत समाजाची मते काँग्रेसच्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. मुंबई-कर्नाटक म्हणजेच आताचा कित्तूर हा भाग लिंगायतांचा बालेकिल्ला आहे. ज्यामध्ये 56 विधानसभा जागा आहेत आणि गेल्या दोन दशकांमध्ये भाजपच्या विजयात हा प्रमुख घटक आहे.

लिंगायत समाज किती महत्वाचा

राज्यातील राजकीय, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वात शक्तिशाली लिंगायत समाज आहे. हा समाज गेल्या 100 वर्षांपासून काँग्रेसशी जुळलेला आहे. 1924 मध्ये बेळगावमध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. तेव्हापासून हा समाज काँग्रेसच्या मागे आहे. 1924 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. तेव्हापासून ते तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधींपर्यंत सर्वांनी लिंगायत समाजाला सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. 1956 मध्ये कर्नाटकचे एकीकरण झाल्यानंतरही 1969 मध्ये पक्षाचे विभाजन होईपर्यंत लिंगायतांचे वर्चस्व होते.

काँग्रेस अन् लिंगायत समाज

1956 मध्ये राज्यांच्या पुनर्रचनेमुळे लिंगायत राजकारणाचा विस्तार झाला. 1973 मध्ये नवीन म्हैसूर राज्याचे नाव बदलून कर्नाटक असे करण्यात आले. 1956 ते 1971 या काळात वोक्कलिगांसह लिंगायतांनी काँग्रेसच्या राजकारणावर वर्चस्व गाजवले. लिंगायत समाजातील बीडी जट्टी, एस निजलिंगप्पा, एसआर कंठी आणि वीरेंद्र पाटील हे त्यानंतरचे मुख्यमंत्री होते.

1969 मध्ये काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमुळे लिंगायतांना वेगळी दिशा मिळाली. एस निजलिंगप्पा यांच्या नेतृत्वाखालील समाज इंदिरा काँग्रेसपासून फारकत घेऊन जुन्या काँग्रेसकडे वळला होता. कदाचित एखादी धोरणात्मक चूक झाली असेल ज्यामुळे समाजाने सत्तेच्या खेळात आपले वर्चस्व गमावले असेल.

येदियुरप्पा यांचा प्रभाव

लिंगायत समाजातील प्रभावशाली नेता व माजी मुख्‍यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचा प्रभाव कमी होत आहे. यामुळे काँग्रेस या ठिकाणी आपली शक्ती खर्च करत आहे. भाजप लिंगायत समाजादील प्रभावशाली नेत्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच जे भाजपमधून बाहेर पडले आहे, त्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मोदी यांच्या सभा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा अजून झालेली नाही. परंतु भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांपासून पक्षाचे अनेक प्रमुख नेते व केंद्रीय मंत्री कर्नाटकात येणार आहे. १ मार्चपासून भाजपकडून चार विजय संकल्प रथयात्रा काढण्यात येणार आहे. राज्याच्या चारही दिशांमधून काढण्यात येणाऱ्या या रथयात्रेत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणांहून या रथयात्रांना हिरवा झेंडा दाखवतील.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.