AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसनं आधी भाजपवर केली सडकून टीका, नंतर द्यावं लागलं स्पष्टीकरण, नेमकं कोण काय बोललं…

भाजप आणि आरएसएस आणि त्यांच्या नेत्यांच्या फुटीरतावादी विचारसरणीला मी पाच दशकांपासून विरोध करत आलो आहे. माझा राजकीय लढा त्यांच्या राजकारणाविरुद्ध होता, आहे आणि राहील.

काँग्रेसनं आधी भाजपवर केली सडकून टीका, नंतर द्यावं लागलं स्पष्टीकरण, नेमकं कोण काय बोललं...
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 11:30 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे गुरुवारी अडचणीत सापडले. खर्गे यांनी भाजपवर टीका करताच त्यांना भाजपने घेरले असता त्यांना त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. खर्गे यांनी सांगितले की, मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही त्यांना विष समजा किंवा मानू नका, पण त्याचा स्वाद घेतला तर मृत्यू होईल. त्यामुळे तुम्हाला आता खरचं प्रश्न पडत असेल की हे खरंच विष आहे का? मल्लिकार्जून खर्गे यांच्या त्या विधानावर भाजपने त्यांना घेरले असता त्यावर स्पष्टीकरण देत ते म्हणाले की, मी पंतप्रधान यांच्याबद्दल बोललो नाही. आणि मी वैयक्तिक विधानंही केले नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

काँग्रेसला भाजपने घेरल्यावर मल्लिकार्जून खर्गे यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भाजपची विचारधारा फुटीरतावादी, शत्रुत्वाची, गरीब आणि दलितांबद्दल द्वेषाची असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

त्यावेळी ते म्हणाले की, मी द्वेष आणि द्वेषाच्या राजकारणावर चर्चा केली. माझे विधान पंतप्रधान मोदींसाठी वैयक्तिकरित्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसाठी नव्हते, तर ते ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात त्यावरून माझ्यावर त्यांनी टीका केली होती.

मल्लिकार्जून खर्गे यांनी आपली बाजू स्पष्ट करताना त्यांनी लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची आमची लढाई ही वैयक्तिक नाही. त्यामुळे ही वैचारिक लढाई आहे.

कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता आणि कळत-नकळत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर तो माझा हेतू कधीच नव्हता आणि माझ्या दीर्घ राजकीय जीवनाचा तो माझा भागही नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

खर्गे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मी नेहमीच मित्र आणि विरोधकांसाठी राजकीय शुद्धतेचे नियम आणि परंपरांचे पालन केले आहे. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तेच करणार आहे.

मी उच्च पदांवर बसलेल्या लोकांप्रमाणे लोकांची आणि त्यांच्या समस्यांची चेष्टा करत नाही कारण मी गरीब आणि दीनदुबळ्यांच्या व्यथा आणि वेदना पाहिल्या आहेत.

भाजप आणि आरएसएस आणि त्यांच्या नेत्यांच्या फुटीरतावादी विचारसरणीला मी पाच दशकांपासून विरोध करत आलो आहे. माझा राजकीय लढा त्यांच्या राजकारणाविरुद्ध होता, आहे आणि राहील असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

भारत सरकारचा तुर्कीला मोठा दणका; 9 विमानतळांवरची सुरक्षा परवानगी रद्द
भारत सरकारचा तुर्कीला मोठा दणका; 9 विमानतळांवरची सुरक्षा परवानगी रद्द.
मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त म्हणून.. ; राऊतांचा विरोधकांना टोला
मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त म्हणून.. ; राऊतांचा विरोधकांना टोला.
भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीला मुदतवाढ दिली
भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीला मुदतवाढ दिली.
उपकाराची जाणीव मोदींनी किती ठेवली?, राऊतांचे खळबळजनक दावे, गौप्यस्फोट
उपकाराची जाणीव मोदींनी किती ठेवली?, राऊतांचे खळबळजनक दावे, गौप्यस्फोट.
‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.