AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कृषी कायद्यांसारख्या कठोर सुधारणा रेटण्यासाठीच जनतेने मोदींना बहुमत दिलेय’

नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयानंतर सरकारची उलटी गणती सुरु झाली, असे अनेकांनी म्हटले. | Narendra Singh Tomar

'कृषी कायद्यांसारख्या कठोर सुधारणा रेटण्यासाठीच जनतेने मोदींना बहुमत दिलेय'
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 7:44 AM

नवी दिल्ली: देशातील जनतेने मोदी सरकारला फक्त सत्तेत राहण्यासाठी नव्हे तर कठोर सुधारणा रेटण्यासाठीच बहुमत दिले आहे, असे वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी केले. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर कायद्यासारखे (GST) निर्णय घेण्यात आले. तेव्हा या निर्णयांना विरोध झाला. मात्र, हे निर्णय आमुलाग्र बदल करणारे आणि 2019 साली भाजपला आणखी भक्कम बहुमत मिळवून देणारे ठरल्याचा दावाही कृषिमंत्री तोमर यांनी केला. (Union agirculture Minister on farmers protest in Delhi)

नरेंद्र सिंह तोमर यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात केंद्र सरकारची बाजू स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या कार्यकाळात अनेक सुधारणा केल्या. नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयानंतर सरकारची उलटी गणती सुरु झाली, असे अनेकांनी म्हटले. मात्र, 2019 च्या निवडणुकीत जनतेने मोदी सरकारला 287 जागांऐवजी 303 जागांचे भक्कम संख्याबळ मिळवून दिले.

याचा अर्थ असा की, राजकीय स्वार्थ, व्होटबँकेचे राजकारण आणि दबावाच्या राजकारणामुळे आजपर्यंत ज्या सुधारणा अंमलात येऊ शकल्या नाहीत त्यापलीकडे जाऊन मोदींनी काम करावे, अशी जनतेची अपेक्षा आहे. फक्त सत्तापालटासाठी नव्हे तर खऱ्या अर्थाने बदल घडवण्यासाठी जनतेने मोदी सरकारला पुन्हा निवडून दिले, असा दावा तोमर यांनी केला.

‘शेतकरी तडजोडीला मान्य असतील तेव्हाच सरकार त्यांना चर्चेसाठी बोलावेल’

सरकारने दिलेला तडजोडीचा प्रस्ताव शेतकरी ज्यादिवशी मान्य करतील तेव्हा केंद्र सरकार आंदोलकांना पुन्हा चर्चेसाठी बोलावे, असे नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट केले. आम्ही शेतकऱ्यांना 9 डिसेंबरला एक प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सध्या शेतकरी नेत्यांशी अनौपचारिक चर्चा सुरु आहे. सरकारचा हा प्रस्ताव मान्य केल्यास मी शेतकऱ्यांना चर्चेचे निमंत्रण पाठवायला तयार असल्याचे तोमर यांनी सांगितले.

आम्ही शेतकऱ्यांना जाचक वाटत असलेल्या कृषी कायद्यातील काही तरतुदींचा पुनर्विचार करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, आंदोलकांना कायद्यातील प्रत्येक कलमावर स्वतंत्रपणे चर्चा करायची नाही. त्यांना आणखी काही चिंता सतावत आहेत. यामध्ये पिकांचे तण जाळणे आणि वीज बिलासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. आम्ही त्यावरही चर्चा करायला तयार असल्याचे नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या:

नारी शक्तीने शेतकरी आंदोलनाची ताकद वाढली, 2000 पेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांचा सहभाग

शेतकऱ्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षांची बंदूक : पंतप्रधान मोदी

(Union agirculture Minister on farmers protest in Delhi)

भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी
भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी.
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की...
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की....
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?.
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.