AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा उल्लेख असलेला ‘तो’ मजकूर हटवा; मोदी सरकारचा सोशल मीडिया कंपन्यांना महत्त्वाचा आदेश

जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या निवेदनात B.1.617 व्हेरिएंटचा कुठेही भारताशी संबंध जोडलेला नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. | Coronavirus Indian variant

भारताचा उल्लेख असलेला 'तो' मजकूर हटवा; मोदी सरकारचा सोशल मीडिया कंपन्यांना महत्त्वाचा आदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 2:42 PM

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना विषाणूच्या ‘इंडियन व्हेरिएंट’ची प्रचंड चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना महत्वपूर्ण आदेश दिले आहेत. त्यानुसार कोरोनाच्या (Coronavirus) B.1.617 या व्हेरिएंटचा उल्लेख इंडियन व्हेरिएंट असा करू नये, अशा सक्त सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. तसेच अशाप्रकारचा उल्लेख असलेला मजकूर संबंधित व्यासपीठावरून तात्काळ हटवण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. (Modi govt asked social meida companies to remove cotents referring to Indian variant of Coroanvirus)

यापूर्वी 11 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या B.1.617 व्हेरिएंटविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर काही वृत्तसंस्थांनी याचा उल्लेख इंडियन व्हेरिएंट, असा करायला सुरुवात केली होती. मात्र, हा दावा सपशेल पोकळ आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या निवेदनात B.1.617 व्हेरिएंटचा कुठेही भारताशी संबंध जोडलेला नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, चुकीच्या माहितीमुळे भारताच्या प्रतिमेला तडा जात आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना इंडियन व्हेरियन्टबाबतचा मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले.

B.1.617 व्हेरिएंट 44 देशांमध्ये

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, B.1.617 व्हेरिएंटचा प्रसार जगातील 44 देशांमध्ये आढळून आला आहे. हा विषाणू अधिक वेगाने संसर्ग फैलावतो. त्यामुळेच भारतात कोरोनाची रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. मात्र, या कोरोना लसीमुळे या विषाणूचा प्रभाव कमी होतो, असेही WHO ने स्पष्ट केले होते.

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत आता काहीशी घट होताना दिसत आहे (Corona Cases in India). सलग तीन दिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्यानंतर कालच्या आकडेवारीत काहीशी घट पाहायला मिळाली. त्यानंतर आजही कोरोना रुग्णांच्या संख्या कालच्या तुलनेट घटली आहे. गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 57 हजार 299 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 194 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 57 हजार 630 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

संबंधित बातम्या:

Covaxin: भारत बायोटेकची कोवॅक्सिन कोरोनाच्या बी.1.617 वेरियंटवर प्रभावी, अमेरिकेचे CMO डॉ.अँथनी फौसींचं वक्तव्य

Coronavirus: कोव्हॅक्सिन घेणाऱ्या भारतीयांना आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करण्यास मज्जाव?

Corona Cases in India | देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट, कोरोनाबळींची संख्याही कमी

(Modi govt asked social meida companies to remove cotents referring to Indian variant of Coroanvirus)

IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही.
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे.