My India My Life Goals: तर संपूर्ण भारत होईल हिरवागार, हरियाणाचे Tree Man यांचं देशवासियांना आवाहन

ट्री मॅन देवेंद्र सूरा: हरियाणा पोलिसात पोलीस कॉन्स्टेबल असलेले सुरा यांनी एक चळवळ सुरु केली आणि आज ते एक जनआंदोलन बनले आहे. त्यांच्यासोबत आज हजारो हात काम करत आहेत.

My India My Life Goals: तर संपूर्ण भारत होईल हिरवागार, हरियाणाचे Tree Man यांचं देशवासियांना आवाहन
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 4:41 PM

Tree Man Devender Sura: आपण 5 जून रोजीच पर्यावरण दिवस का साजरा केला पाहिजे? प्रत्येक दिवशी आपण पर्यावरण दिवस साजरा का नाही करु शकतं? असा सवाल हरियाणाचे ट्री-मॅन देवेंद्र सूरा यांनी केला आहे. ही व्यक्ती असा प्रश्न करु शकते कारण ते गेल्या १० वर्षापासून हरियाणातील जमीन हिरवीगार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत त्यांनी एक लाखाहून अधिक झाडे लावली आहेत. त्यांचं मत आहे की, आपण दररोज पर्यावरण दिवस साजरा केला पाहिजे. यासाठी त्यांनी देशभरातील नागरिकांना आवाहन केले आहे.

हरियाणा पोलिसात कॉन्स्टेबल असलेले देवेंद्र सूरा म्हणतात की, आपण पशु-पक्षींमध्ये सोबत ही रमलो पाहिजे. मुळचे सोनीपतचे असलेले देवेंद्र सुरा हे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत आहेत. ते म्हणतात की, यासाठी शक्य तेवढा सायकलचा वापर केला पाहिजे. त्यांनी एकट्याने सुरु केलेल्या या चळवळीचे आता वटवृक्ष झाले आहे. यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. ते म्हणतात की, त्यांना पर्यावरणाच्या अधिक जवळ यायचे आहे. ते म्हणतात की, भारत देश तेव्हाच हिरवागार आणि स्वच्छ होईल जेव्हा आपण दररोज पर्यावरण दिवस साजरा करु.

१५० हून अधिक गावात मोहिम

देवेंद्र सूरा यांनी सुरु केलेली ही चळवळ आता 150 हून अधिक गावांमध्ये पोहोचली आहे. त्यांनी आतापर्यंत एक लाखाहून अधिक झाडे लावली आहेत. त्यांच्यामुळे आज हे एक लोकांची चळवळ बनली आहे. हरियाणाच्या 152 हून अधिक जिल्हा पंचायतींमध्ये त्यांच्यासोबत स्वयंसेवक काम करत आहेत.

कशी आली ही कल्पना

वृक्ष लावण्याबाबत त्यांच्या मनात तेव्हा आले जेव्हा ते चंडीगढमध्ये काम करत होते. त्यांनी आपल्या गावी गृहनगर सोनीपतला हिरवेगार करण्याचे ठरवले. सुरा यांनी सुरुवात आपल्या आजुबाजुच्या परिसरातून केली आणि त्यांनी आता १५० हून अधिक गावांमध्ये पोहोचली.

TV9 ही सहभागी

जगभरात ५ जून रोजी पर्यावरण दिवस साजरा केला जातो. पर्यावरण दिन (World Environment Day) 1973 पासून साजरा केला जावू लागला. यावर्षी याला 50 वर्ष झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात लाईफस्टाईल फॉर एनवायरमेंट मुव्हमेंटच्या अंतर्गत ‘माय इंडिया माय लाईफ गोल्स’ (My India My Life Goals) नावाचा उपक्रम भारत सरकारने सुरु केला आहे. पर्यावरणच्या रक्षणासाठी भारत सरकारच्या या मोहिमेत टीव्ही ९ देखील सहभागी आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.