AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi: भ्रष्टाचारात सजा झाली तरी सगळीकडे उदोउदो कसा? गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते मोदींच्या टार्गेटवर

आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. संविधान दिनाचे महत्त्व, लोकशाहीची बलस्थाने यांचे महत्त्व सांगतानाच आजच्या लोकशाहीला कशापासून धोके आहेत, याबद्दलही पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली.

Narendra Modi: भ्रष्टाचारात सजा झाली तरी सगळीकडे उदोउदो कसा? गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते मोदींच्या टार्गेटवर
संविधान दिनानिमित्त भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 1:44 PM

नवी दिल्लीः आज संविधान दिनानिमित्त ( Constitution Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय लोकशाही, संविधान आणि देशातील सद्य राजकीय स्थितीवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या किंबहुना भ्रष्टाचारी म्हणून सिद्ध झालेल्या नेत्यांचा कशा प्रकारे उदो उदो सुरु आहे, या विषयी चिंता व्यक्त केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची स्पर्धा लागली आहे, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला. लोकशाहीच्या हितासाठी काम करणाऱ्यांनी याबाबत जागरूकता निर्माण करावी, असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी त्यांनी केलं.

भ्रष्टाचारी नेत्यांविषयी काय म्हणाले पंतप्रधान?

संविधान दिनानिमित्त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी देशात सक्षम अशी न्यायव्यवस्था आहे. पण याच न्यायव्यवस्थेने एखाद्या नेत्याला भ्रष्टाचारी घोषित केलेले असेल, एखाद्याला शिक्षा दिलेली असेल तरीही आज केवळ राजकीय स्वार्थापोटी त्या नेत्यालाही मोठेपण दिले जात आहे. राजकीय लालसेपोटी त्यांचे महिमामंडन केले जात आहे. त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाल्यानंतरही लोकलज्जा सोडून त्यांना जाहीर कार्यक्रमात बोलावलं जातं. अशा नेत्यांची पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठांवर ऊठ-बस सुरु होते. देशातील नवीन पिढी यातून काय बोध घेईल? भ्रष्टाचारात बरबटलेल्या लोकांची पुन्हा एकदा प्रतिष्ठा वाढवली जात असेल तर आपण कितीही भ्रष्टाचार केला तरी दोन-चार वर्षात लोक ते विसरतात, पुन्हा त्या नेत्याला स्वीकारतात, अशीच लोकभावना होईल. गुन्हा सिद्ध झाला असेल तर संबंधित नेत्याला सुधारण्यासाठी अवश्य संधी मिळावी. पण सार्वजनिक जीवनात अशा व्यक्तींना प्रतिष्ठा देण्याची जी स्पर्धा लागली आहे, ती लोकशाहीसाठी अधिक घातक असल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली.

‘पार्टी फॉर द फॅमिली’ वर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय परिवारांत चाललेल्या कौटुंबिक पार्ट्यांवरही यावेळी भाष्य केले. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या संकटामुळे संविधानाच्या मुख्य प्रतिमेला या मुळे धोका निर्माण झाला आहे, नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती एका पक्षात असणे गैर नाही. मात्र एकच राजकीय पक्ष पिढ्यान् पिढ्या एकाच कुटुंबाच्या सत्तेत असणे हा चिंतेचा विषय असल्याचे मत मोदी यांनीन यावेळी व्यक्त केले. लोकशाहीसाठी हे अधिक घातक ठरू शकते, असे ते म्हणाले.

इतर बातम्या-

महाराष्ट्रातल्या मराठी उद्योगपतीच्या घरातला वाद कसा मिटणार? किर्लोस्करांना सुप्रीम कोर्टानं मार्ग दाखवला

Pm modi : संविधान दिवसाच्या पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री म्हणाले…

काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान.
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी.
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.