Navneet Rana: रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकल्यानंतर विचारेन वेदना काय असतात; नवनीत राणांचा संताप

Navneet Rana: नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

Navneet Rana: रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकल्यानंतर विचारेन वेदना काय असतात; नवनीत राणांचा संताप
रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकल्यानंतर विचारेन वेदना काय असतात; नवनीत राणांचा संतापImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 12:23 PM

नवी दिल्ली: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राणा दाम्पत्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्यावरही नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेचा दुरुपयोग केला आहे. हनुमान चालिसासाठी आम्हाला आत टाकलं. महिलांना तुरुंगात टाकणारं हे सरकार आहे. माझ्यावर जो अन्याय केला. हनुमान चालिसापासून ते तुरुंगापर्यंत मला त्रास दिला गेला. आजही त्रास होत आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार नाहीत. ज्या दिवशी तुमची सत्ता जाईल आणि रश्मी ठाकरेंना (rashmi thackeray) तुरुंगात टाकलं तर त्या दिवशी त्यांना विचारेन आता कसं वाटतंय. वेदना काय असते. तुरुंग काय असतो आणि तुरुंगातील एक एक मिनिट किती वेदनादायी असतो, हे मी मुख्यमंत्र्यांना विचारेल. काही ही गुन्हा न करता तुरुंगात टाकल्यावर त्याची वेदना काय असते हे तेव्हाच तुम्हाला कळेल. हा दिवस एक दिवस येणारचय तुमची सत्ता गेल्यावर तुमच्या घरातील महिला तुरुंगात गेल्यावर तुम्हाला मी हा सवाल करणारच, असा संताप नवनीत राणा यांनी व्यक्त केला.

नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. एका महिलेला कारण नसताना तुरुंगात टाकलं जातं. तिला काय वेदना होत असतील याची कल्पना तरी तुम्हाला आहे का? आम्ही घाबरून तिकडे जात आहे असं तुम्ही म्हणता. आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत. आम्ही तुमच्या कोणत्याही जाळ्यात फसणारे लोक नाहीत, असं नवनीत राणा म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

मोदींनी बाळासाहेबांचा अजेंडा पूर्ण केला

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 हटवण्याची मागणी केली होती. त्यांचं हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. तुम्ही म्हणता हनुमान चालिसा म्हणायचा असेल तर काश्मीरमध्ये जा. हनुमान चालिसा वाचण्यासाठी मी जम्मू काश्मीरमध्ये जाऊ शकते तर महाराष्ट्रात पठण का करू शकत नाही? महाराष्ट्रावर संकट आलं आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणत होते. महाराष्ट्रात लोडशेडिंग सुरू आहे. बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ही संकट दूर करण्यासाठीच आम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं होतं. जेव्हा महाराष्ट्रावर संकट येतं तेव्हाच संकटमोचकाची आठवण केली जाते, असंही त्यांनी सांगितलं.

तर बाळासाहेबांनी…

अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकला होता. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं अर्पण करणाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक शब्दही बोलले नाहीत. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी अशा लोकांना जमिनीत गाडले असते. मात्र, महाराष्ट्राला इतका लाचार मंत्री मिळाला हे दुर्देव आहे. मातोश्री आज दहा जनपथच्या विचारधारेवर चालत आहे. त्यांच्यासाठी दहा जनपथ हीच मातोश्री झाली आहे. आजची शिवसेना ही शिवसेना नसून ती औरंजेब सेना झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

लाडक्या बहिणींसाठी काय खास?;दादांनी सांगितली राज्याच्या बजेटची तारीख
लाडक्या बहिणींसाठी काय खास?;दादांनी सांगितली राज्याच्या बजेटची तारीख.
मोदी सरकारची मोठी घोषणा, गंभीर आजारावरील 36 औषधं टॅक्स फ्री
मोदी सरकारची मोठी घोषणा, गंभीर आजारावरील 36 औषधं टॅक्स फ्री.
मध्यमवर्गीयांवर फोकस, नोकरदारांना मोठा दिलासा; अशी असणार नवी कररचना
मध्यमवर्गीयांवर फोकस, नोकरदारांना मोठा दिलासा; अशी असणार नवी कररचना.
यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त-काय महाग? बघा एकाच व्हिडीओमध्ये....
यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त-काय महाग? बघा एकाच व्हिडीओमध्ये.....
Union Budget 2025 : अर्थसंकल्पातील 'या' 10 महत्त्वाच्या घोषणा
Union Budget 2025 : अर्थसंकल्पातील 'या' 10 महत्त्वाच्या घोषणा.
'...म्हणून मुंडेंना आधार दिला', महंत नामदेव शास्त्री स्पष्टच बोलले
'...म्हणून मुंडेंना आधार दिला', महंत नामदेव शास्त्री स्पष्टच बोलले.
गडाआडून मुंडेंचा दबाव? तर महंत नामदेव शास्त्रींचा 'राजकीय' इशारा काय?
गडाआडून मुंडेंचा दबाव? तर महंत नामदेव शास्त्रींचा 'राजकीय' इशारा काय?.
भगवानगडाचं 'राजकीय' दार तब्बल 11 वर्षांनी कसं उघडलं?
भगवानगडाचं 'राजकीय' दार तब्बल 11 वर्षांनी कसं उघडलं?.
देशाचा 'अर्थ' संकल्प कसा असेल? थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी क्लिक करा...
देशाचा 'अर्थ' संकल्प कसा असेल? थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी क्लिक करा....
हत्या महाराष्ट्रात, मृतदेह गुजरातमध्ये..धोडींच्या हत्येचा असा घटनाक्रम
हत्या महाराष्ट्रात, मृतदेह गुजरातमध्ये..धोडींच्या हत्येचा असा घटनाक्रम.