Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन पॉप्युलेशन पॉलिसी! दोन पेक्षा जास्त मुले असल्यास निवडणूक लढवता येणार

New Population Policy Rules: 2036 पर्यंत देशात 12% पेक्षा जास्त वृद्ध असणार आहे, असे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोषच्या (UNFPA) अहवालात म्हटले आहे. इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 नुसार 2011 भारतीय लोकसंख्येचे सरासरी वय 24 होते. सध्या ते 29 झाले आहे.

नवीन पॉप्युलेशन पॉलिसी! दोन पेक्षा जास्त मुले असल्यास निवडणूक लढवता येणार
New Population Policy
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 10:36 AM

New Population Policy Rules: जगात भारत लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जनसंख्या नियंत्रण धोरणाचा अवलंबन केले जात होते. परंतु आता देशात वृद्धांची वाढत जाणारी संख्या आणि युवकांची कमी होत असलेल्या संख्येमुळे चिंता होऊ लागली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी जाहीरपणे ही चिंता व्यक्त करत नवीन लोकसंख्या धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात युवकांची संख्या वाढवण्यासाठी दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या परिवाराला प्रोत्साहन दिले जाणार आहे. नवीन कायद्यात दोन पेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना निवडणूक लढवता येणार आहे.

प्रचनन दरात घट

चंद्रबाबू नायडू म्हणाले, दक्षिण भारतात ज्येष्ठांची संख्या वाढत आहेत. जपान, चीन आणि काही युरोपीय देश या समस्येचा सामना करत आहेत. या ठिकाणी जनसंख्येचा एक मोठा भाग ज्येष्ठ व्यक्ती आहे. तसेच चांगल्या संधी मिळत असल्यामुळे युवक विदेशात जात आहेत. दक्षिण भारतात हे आव्हान अधिक आहे. आंध्र प्रदेशातील अनेक गावात वृद्ध व्यक्तीच राहिल्या आहेत. युवा पिढी शहरात गेली आहे. दक्षिण भारतातील प्रजनन दर 1.6 टक्के खाली आले आहे. राष्ट्रीय प्रजनन दर 2.1 आहे. जर प्रजनन दरात अशीच घट होत राहिली तर 2047 पर्यंत वृद्धांची संख्या लक्षणीय होणार आहे.

देशात वृद्धांची संख्या वाढली

भारतात वृद्धांची संख्या वाढत असल्याचे केंद्राचे यूथ इन इंडिया-2022 रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्या अहवालानुसार 2036 पर्यंत देशातील 34.55 कोटी लोकसंख्या युवा असणार आहे. ती सध्या 47% पेक्षा जास्त आहे. सध्या देशात 25 कोटी युवक 15 ते 25 वर्षांचे आहे. परंतु पुढील 15 वर्षांत त्यात लक्षणीय घट होणार आहे.

हे सुद्धा वाचा

2036 पर्यंत देशात 12% पेक्षा जास्त वृद्ध असणार आहे, असे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोषच्या (UNFPA) अहवालात म्हटले आहे. इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 नुसार 2011 भारतीय लोकसंख्येचे सरासरी वय 24 होते. सध्या ते 29 झाले आहे.

'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?.
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला.
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं.
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत..
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत...
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?.
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने...
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने....
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी.