Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओडिसा रेल्वे अपघात प्रकरणी CBI ची मोठी कारवाई, इंजिनिअरचे घर सील करताच परिवारासह बेपत्ता

Odisha Train Accident : ओडिशामधील भीषण रेल्वे अपघाताचा सीबीआयने तपास सुरु केला आहे. या प्रकरणी एका अभियत्याची चौकशी केली. या चौकशीनंतर तो परिवारासह बेपत्ता झाला आहे. यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

ओडिसा रेल्वे अपघात प्रकरणी CBI ची मोठी कारवाई, इंजिनिअरचे घर सील करताच परिवारासह बेपत्ता
Odisha train accident Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 2:45 PM

भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयचा तपास सुरु आहे. २ जून रोजी झालेल्या या अपघातात 278 जणांचा मृत्यू झाला होता तर 1100 लोक जखमी झाले होते. या तिहेरी रेल्वे अपघाताचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. सीबीआयचे १० सदस्यीय पथकाने हा तपास सुरु केला आहे. या प्रकरणी सीबीआयने कनिष्ठ अभियंत्याची अज्ञातस्थळी चौकशी केली होती. त्यानंतर त्याचे घरही सील केले. परंतु त्यानंतर त्याचा परिवार बेपत्ता झाला आहे. यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

काय केली कारवाई

ओडिशात बालासोर येथे २ जून रोजी रेल्वेचा तिहेरी अपघात झाला होता. या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्यानंतर सीबीआयने सोरो सेक्शनचे सिग्नल विभागातील कनिष्ठ अभियंता अमीर खान याची अज्ञात स्थळी चौकशी केली. त्यानंतर त्याचे घर सील केले. या घरात तो भाड्याने राहत होता. सीबीआयने चौकशी करताच तो कनिष्ठ अभियंतासह बेपत्ता झाला आहे.

प्राथमिक तपासात दावा

प्राथमिक तपासानंतर ओडिशामधील अपघातामागे सिग्नल प्रणालीत केलेला बदल हे अपघाताचे कारण असल्याचे मानले जात आहे. यामुळे रेल्वेने स्टेशन रिले रूम आणि कंपाऊंड हाउसिंग सिग्नलिंग उपकरणांच्या सुरक्षेसाठी सर्व विभागीय मुख्यालयांना अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच एक सुरक्षा मोहीम देखील सुरू केली आहे, ज्यामध्ये दुहेरी लॉकिंग व्यवस्थेचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

कसा झाला अपघात

कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नईहून पश्चिम बंगलाच्या हावडाकडे जात होती. ओडिशामधील बालासोरपासून 40 किमी अंतरावर ही एक्सप्रेस मालगाडीला धडकली आहे. या भीषण अपघातात कोरोमंडल एक्सप्रेसचे 18 डब्बे रुळावरुन घसरले आहेत. तर चार ते पाच डब्बे आडवे पडले आहेत. घटनास्थळी हाहाकार उडाला आहे

बहनागा स्टेशनजवळ शुक्रवारी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली. यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डब्बे यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस ज्या रेल्वे रुळावरुन जात होती, त्या ठिकाणी पडले. यामुळे या गाडीचा अपघात झाला. या तिहेरी अपघातात अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले. चार डब्बे रेल्वे बाँड्रीच्या बाहेर गेले. एकूण 15 डब्बे पटरीच्या बाहेर होते.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.