AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमध्ये पुन्हा NDA सरकार, पंतप्रधान मोदींना विश्वास, RJD आणि काँग्रेसवर सडकून टीका

बिहार विधानसभा निवडणुकीच्पया हिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबरला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. मोदी यांनी RJD आणि कांग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याही आज बिहारमध्ये दोन सभा होणार आहेत.

बिहारमध्ये पुन्हा NDA सरकार, पंतप्रधान मोदींना विश्वास, RJD आणि काँग्रेसवर सडकून टीका
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 12:01 PM

रोहतास: बिहारमध्ये भाजप, JDU आणि मित्र पक्षांच्या NDAचंच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. अनेक सर्वेक्षणात एनडीएची सत्ता येणार हे स्पष्ट झाल्याचं मोदी म्हणालेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज बिहारमध्ये प्रचाराचा धुरळा उडवत आहेत. आज पंतप्रधान मोदी यांची बिहारमधील पहिली सभा रोहतास जिल्ह्यातील डेहरी ऑन सोन इथं पार पडली. (PM Narendra Modi in Bihar election campaign)

पंतप्रधान मोदी यांनी बिहारमधील जनतेला संबोधित करताना RJD आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. बिहारमधील लालटेनचा जमाना गेला. आज बिहारमध्ये रस्ते, वीज, सर्वकाही आहे. बिहारमधील लोक न घाबरता बिहारमध्ये राहात आहेत. ज्यांचा इतिहास बिहारला बिमारु बनवण्याचा आहे, त्यांना जवळपासही फिरु न देण्याचं आता बिहारच्या जनतेनं ठरवलं आहे’. अशा शब्दात मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या RJDवर शरसंधान साधलं.

रामविलास पासवान आणि रघुवंश प्रसाद सिंह यांना श्रद्धांजली

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात दिवंगत रामविलास पासवान आणि रघुवंश प्रसाद सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली. बिहारने नुकतेच आपल्या अशा दोन सुपुत्रांना गमावले, ज्यांनी इथल्या लोकांची अनेक वर्षे सेवा केली. माझे जवळचे मित्र, गरीब, दलितांसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या आणि शेवटपर्यंत माझ्यासोबत राहणाऱ्या रामविलास पासवान यांना श्रद्धांजली अपर्ण करतो, अशा शब्दात मोदी यांनी पासवान यांना श्रद्धांजली वाहिली. तसंच गरीबांच्या विकासासाठी निरंतर काम करणाऱ्या रघुवंश प्रसाद सिंह यांनाही पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

पंतप्रधान मोदी – राहुल गांधी आज आमने-सामने

बिहारमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दोन रॅली होणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत JDUचे अध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार असतील तर राहुल गांधी यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री आणि RJD नेते तेजस्वी यादव असणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या आज बिहारमध्ये तीन सभा होणार आहेत. रोहतास जिल्ह्यातील डेहरी ऑन सोन, गया आणि भागलपूर इथं पंतप्रधान मोदी यांची रॅली आणि सभा होणार आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आज दोन रॅली होणार आहेत. नवादा जिल्ह्यातील हिसुआ आणि भागलपूर जिल्ह्यातील कहलगांव इथं राहुल गांधी यांच्या सभा होणार आहेत. यावेळी RJD नेते तेजस्वी यादव हे राहुल यांच्यासोबत हिसुआतील रॅली आणि सभेत सहभागी होणार आहेत.

संबंधित बातम्या:

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पंतप्रधान मोदी-राहुल गांधी आज आमनेसामने, रॅली आणि सभांचा धडाका

सत्ता दिल्यास मोफत लस देऊ; बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपचं आश्वासन

PM Narendra Modi in Bihar election campaign

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.