AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP Meeting In Hyderabad : हैदराबाद नव्हे भाग्यनगर! भाजपा कार्यकारिणी बैठकीत काय म्हणाले पंतप्रधान मोदी? रवीशंकर प्रसादांनी केलं स्पष्ट

हैदराबादला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग्यनगर म्हटले आहे. येथूनच एक आता एक भारतवरून श्रेष्ठ भारत करण्याची जबाबदारी भाजपाच्या खांद्यावर आहे, असे भाजपा नेते रवीशंकर प्रसाद म्हणाले.

BJP Meeting In Hyderabad : हैदराबाद नव्हे भाग्यनगर! भाजपा कार्यकारिणी बैठकीत काय म्हणाले पंतप्रधान मोदी? रवीशंकर प्रसादांनी केलं स्पष्ट
नरेंद्र मोदी/रवीशंकर प्रसादImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 5:44 PM

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हैदराबादला भाग्यनगर (Bhagya Nagar) म्हणाले, जे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंड भारताचा पाया रचला आणि आता तो पुढे नेण्याची जबाबदारी भाजपाची आहे, असे वक्तव्य भाजपा नेते रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी केले आहे. ते हैदराबादमध्ये बोलत होते. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सध्या हैदराबादमध्ये सुरू आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच इतर महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक आहे. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होत असतानाच भाग्यनगरचा म्हणजेच हैदराबादच्या नामांतराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

‘एक भारताचा रचला होता पाया’

भारत अखंड ठेवण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान आहे. याच वल्लभभाई पटेल यांनी हैदराबादमध्ये एक भारताचा, अखंड भारताचा पाया रचला. मात्र तो तोडण्याचा खूप प्रयत्न त्याकाळी झाला, असे भाजपा नेते रवीशंकर प्रसाद म्हणाले. आता याच हैदराबादला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग्यनगर म्हटले आहे. येथूनच एक आता एक भारतवरून श्रेष्ठ भारत करण्याची जबाबदारी भाजपाच्या खांद्यावर आहे, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा हैदराबाद भाग्यनगरचा राग आळवला आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले रवीशंकर प्रसाद?

दोन दिवसीय बैठकीचा समारोप

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीच्या समारोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी परेड ग्राऊंडवर जाहीर सभेला संबोधित करतील. त्याठिकाणी 35 हजारांहून अधिक नागरिक असतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री केसीआर यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राप्रमाणे तेलंगाणाचे सरकार पाडून दाखवा, असे आव्हानच त्यांनी भाजपाला दिले. त्याचबरोबर भाजपाच्या राजकारणावरही टीका केली. लोकशाहीसाठी हे लाजीरवाणे असल्याचेही ते म्हणाले. मोदींच्या स्वागतालादेखील ते उपस्थित नव्हते. याउलट ते यशवंत सिन्हा यांच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह विमानतळावर गेले होते. त्यावरून भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.