Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mann Ki Baat: ओमिक्रॉनच्या विरोधात कसं लढायचं?, द्विसूत्री काय?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली ‘मन की बात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या शेवटच्या मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी देशवासियांना सल्लाही दिला.

Mann Ki Baat: ओमिक्रॉनच्या विरोधात कसं लढायचं?, द्विसूत्री काय?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली 'मन की बात'
prime minister narendra
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 11:33 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या शेवटच्या मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी देशवासियांना सल्लाही दिला. स्वयं सतर्कता आणि शिस्त यामुळेच आपण ओमिक्रॉनवर मात करू शकतो, असा कानमंत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशावासियांना दिला.

‘मन की बात’ चा आज 84 वा कार्यक्रम होता. 2021मधील ही शेवटची मन की बात होती. या मन की बातमधून पंतप्रधानांनी ओमिक्रॉनपासून ते तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातावरही भाष्य केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावरही त्यांनी भाष्य केलं. देशात ओमिक्रोन व्हेरिएंट आला आहे. त्याचा अभ्यास आपले संशोधक करत आहेत. या व्हेरिएंटचा रोज नवा डेटा त्यांना मिळत आहेत. त्यावरून संशोधक काही सूचनाही देत आहेत. ओमिक्रॉनविरोधात लढायचं असेल तर स्वयं सतर्कता आणि स्वयं शिस्त या दोन गोष्टीचं पालन करा. हीच ओमिक्रॉन विरोधातील ही मोठी शक्ती आहे. आपली सामूहिक शक्तीच कोरोनाचा पराभव करेल, असं मोदी म्हणाले.

जनशक्तीमुळेच कोरोना पराभूत

आपल्या जनशक्तीमुळेच आपण कोरोनाचा पराभव करू शकलो आहे. जनशक्तीची ताकद आणि सर्वांच्या प्रयत्नामुळेच आपण 100 वर्षात आलेल्या या सर्वात मोठ्या महामारीशी आपण सामना करू शकलो, असं त्यांनी सांगितलं. तसेच नवं वर्ष चांगलं घालवण्यासाठी संकल्प करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

वरुण सिंग प्रेरणादायी

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूत हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेले कॅप्टन वरुण सिंग यांचं स्मरण केलं. वरुण सिंग यांना यंदाच शौर्य पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या शिक्षकाला एक चिठ्ठी लिहिली होती. एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही वरुण सिंग आपलं मूळ विसरले नव्हते. त्यांची ही चिठ्ठी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. एका जरी विद्यार्थ्याला मी प्रेरणा देऊ शकलो तर ही खूप मोठी गोष्ट असेल असं त्यांनी या चिठ्ठीत म्हटलं आहे. मात्र, त्यांनी केवळ एका विद्यार्थ्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला प्रेरित केलं आहे. भलेही पत्रातून ते विद्यार्थ्यांबाबत बोलत असतील, पण त्यांचा हा संदेश आपल्या संपूर्ण समाजासाठी आहे. साधारणपासून असाधारण बनण्याचा त्यांनी जो मंत्र दिला आहे. तो महत्त्वाचा आहे, असं मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या:

PM Modi Mann ki Baat Live : 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीचा सामना देशानं समर्थपणे केला: नरेंद्र मोदी

केंद्रात मोदींचे सुशासन, राज्यात ठाकरेंचे कुशासन; भाजप नेते जावडेकरांचा हल्लाबोल

काय सांगता ? महाराष्ट्र अग्रिमन अधिनिर्णय प्राधिकरणाच्या निर्णयामुळे शेतकरीही गेले चक्रावून, हळद म्हणे…

संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी.
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही.
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार.
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.