AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Temperature : आताचा उन्हाळाच एवढा त्रासदायक, आणखी 60 वर्षांनी कसं असेल मुंबई-पुण्याचं चित्र? काय असेल सरासरी तापमान?

तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे ही मृत्यूची घंटा ही बनू शकते. अशी लाट ही सार्वजनिक आरोग्य आणि अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. यामुळे इकोसिस्टमलाही धोका निर्माण होतो. अशी परस्थिती ओढावत असतानाही आपण जर यावर काही कृती केली नाही तर याचे परिणाम काही काळामध्येच भोगावे लागतील असे मत ग्रीनपीस इंडियाचे मोहीम व्यवस्थापक अविनाश चंचल यांनी व्यक्त केले आहे.

Temperature : आताचा उन्हाळाच एवढा त्रासदायक, आणखी 60 वर्षांनी कसं असेल मुंबई-पुण्याचं चित्र? काय असेल सरासरी तापमान?
राजधानीत तापमानाचा कहर
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 12:59 PM

मुंबई : दिवसेंदिवस (Climate Change) हवामानातील बदल हा वाढत चालला आहे. गत काही वर्षापासून त्याची प्रचिती येत आहे पण भविष्यात यापेक्षा बिकट स्थिती होणार असल्याचा अंदाज (आयपीसीसी) या हवामान संस्थेने वर्तवला आहे. बदलत्या हवामानाला घेऊन ग्रीनपीस इंडियाने 6 अहवाल विशिष्ट परिस्थितीच्या आधारे उष्णतेच्या लाटेच्या अंदाजांचे केले आहेत. यामध्ये (Mumbai) मुंबई आणि पुण्याच्या तापमानात कमालीची वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या दोन्ही शहराचे सरासरीचेच (Temperature Increase) तापमान 5 अंश सेल्सिअसने वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यालतच्या शहरांना उष्णतेचा धोका अधिक असतो. त्यानुसार मुंबई आणि पुण्याचे प्रदूषण हे 2050 पर्यंत दुप्पट होईल अशीच सध्याची स्थिती आहे. भौगोलिक रचनेमुळे अंतर्देशीय असूनही पुण्याचा पॅटर्न तुलनेने वेगळा आहे, यावर प्रकाश टाकताना अहवालात म्हटले आहे की, “उष्णतेच्या लाटेच्या वेळी अंतर्देशीय शहरांमध्ये तापमानात वाढ होत असल्याने किनारपट्टीच्या भागात तापमानात कमी फरक जाणवेल.मात्र, समुद्रातील आर्द्रतेमुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये हवामानाची परिस्थिती निर्माण होईल.” असे अहवालात म्हटले गेले आहे.

उष्णतेची लाट आरोग्यासाठी अन् अर्थव्यवस्थेसाठी घातकच

तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे ही मृत्यूची घंटा ही बनू शकते. अशी लाट ही सार्वजनिक आरोग्य आणि अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. यामुळे इकोसिस्टमलाही धोका निर्माण होतो. अशी परस्थिती ओढावत असतानाही आपण जर यावर काही कृती केली नाही तर याचे परिणाम काही काळामध्येच भोगावे लागतील असे मत ग्रीनपीस इंडियाचे मोहीम व्यवस्थापक अविनाश चंचल यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे वेळीच योग्य ती पावले उचलली तर हे संकट रोखता येऊ शकते. पण त्यादृष्टीने कोणत्या हालचाली दिसून येत नाही ही शोकांतिका आहे.

असुरक्षित समुदायावर सर्वाधिक परिणाम

वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक परिणाम हा समाजातील असुरक्षित म्हणजेच गरीब किंवा ज्यांना निवाऱ्याची सोय नाही यांच्यावर होणार आहे. जे घराबाहेर काम करतात मग यामध्ये स्त्रिया, मुले, ज्येष्ठ नागरिक, लैंगिक अल्पसंख्याक यांचा समावेश होतो. कारण यांना संरक्षणात्मक उपायच उपलब्ध नसतात. त्यामुळे समाजातील अशा नागरिकांची संख्या कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न कऱणे गरजेचे आहे. शिवाय सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही मजबूत केली पाहिजे. नागरिकांनी सतर्क रहावे म्हणून सातत्याने हवामान संस्थांशी साधणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

तापमान कमी करण्यासाठीचे ‘उपाय’

आता तापमानात घट आणने ही जबाबदारी बनली आहे. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा हे केवळ घोषणेपुरते मर्यादित न ठेवता कम्युनिटी न्यूट्रिशनल गार्डन, उद्याने, मिनी फॉरेस्ट, रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांचे आच्छादन आणि पाणवठे ही काळाची गरज आहे. यामुळे दीर्घकाळ तापमानाचे प्रमाण कमी राहणार आहे. 60 वर्षानंतर मुंबई-पुणे पाठोपाठ दिल्लीच्या सरासरी तापमानात 4 अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. याशिवाय, तापमानवाढीमुळे लखनौ, पाटणा, जयपूर आणि कोलकाता या शहरांवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.