AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचा आता नितिश कुमारांना दे धक्का…; ‘या’ बैठकीला काँग्रेस जाणारच नाही….

विरोधी पक्षातील काही नेते या गोष्टीला मान्यता देत नाही.त्यामुळे काँग्रेसच्यावतीने आमचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नितीशकुमार यांच्यावर जबाबदारी टाकली होती की ज्यांना बोलावायचे आहे त्यांना बोलावले पाहिजे.

काँग्रेसचा आता नितिश कुमारांना दे धक्का...; 'या' बैठकीला काँग्रेस जाणारच नाही....
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 12:32 AM

नवी दिल्ली : विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार मोर्चाबांधणी केली असतानाच विरोधकांमध्ये आता कुरघोड्या करण्यास सुरुवात झाली आहे. या बाबत नितीशकुमार यांच्या पुढाकाराने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नितीश यांनी 12 जून रोजी पाटण्यात सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.मात्र या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी या सभेला उपस्थित राहणार नाहीत. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी मात्र यावर बोलताना त्याला दुजोरा दिला आहे.

बिहार प्रदेश काँग्रेस कार्यालय सदकत आश्रमात शनिवारी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत एकीकडे पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेत्यांची निवड झाली,

तर दुसरीकडे अखिलेश प्रसाद सिंह यांनी राहुल गांधी किंवा खर्गे दोघेही 12 जूनच्या एकता बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले.

बिहार काँग्रेसचे अध्यक्ष यांनी सांगितले की, राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असून त्यांचा 12 जूनपर्यंत देशात परतण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्याशी आधीच चर्चा केली होती.

तर दुसरीकडे, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सहभागाच्या प्रश्नावर त्यांनी बोलताना सांगितले की, आमच्या पक्षाच्यावतीने 12 जून रोजी होणाऱ्या बैठकीला केवळ मुख्यमंत्री आणि एका मोठ्या राज्याचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

गेल्या महिन्यात काँग्रेसने विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी 29 मे रोजी सांगितले होते की, नितीश कुमार यांनी त्यांना पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते, आणि त्याला काँग्रेसने त्याचा स्वीकार केला आहे.

अधीर रंजन यांनी बोलताना स्पष्टच सांगितले होते की, विरोधक एकत्र आले की, पंतप्रधान मोदींना निवडणुकीत पराभूत करण्याची संधी मिळणार असं विरोधी पक्षाकडून सांगण्यात येते.

पण विरोधी पक्षातील काही नेते या गोष्टीला मान्यता देत नाही.त्यामुळे काँग्रेसच्यावतीने आमचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नितीशकुमार यांच्यावर जबाबदारी टाकली होती की ज्यांना बोलावायचे आहे त्यांना बोलावले पाहिजे.

जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....