AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway : यात्रीगण कृपया ध्यान दें ! मुंबई ते मध्य प्रदेश धावणार अमृत भारत ट्रेन, पाहा सर्व डिटेल्स

पहिल्याच दिवशी ही ट्रेन लेट झाली आहे. ही ट्रेन तीन तास उशीराने १० वाजता जबलपूरला पोहचली. २५ मिनिटांच्या थांब्यानंतर ट्रेन १०.२५ वाजता जबलपूरहून पुढे रवाना झाली. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास भोगावा लागला आहे.

Indian Railway : यात्रीगण कृपया ध्यान दें ! मुंबई ते मध्य प्रदेश धावणार अमृत भारत ट्रेन, पाहा सर्व डिटेल्स
Follow us
| Updated on: Apr 28, 2025 | 2:23 PM

Amrit Bharat Train : मुंबई ते मध्य प्रदेश प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने मोठी भेट दिली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळत टर्मिनस ते सहरसा दरम्यान देशातील तिसरी अमृत भारत ट्रेन सुरु करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सहरसा – मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाला २४ एप्रिल २०२५ रोजी पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. परंतू पहिल्याच दिवशी ही ट्रेन लेट झाली आहे. ही ट्रेन तीन तास उशीराने १० वाजता जबलपूरला पोहचली. २५ मिनिटांच्या थांब्यानंतर ट्रेन १०.२५ वाजता जबलपूरहून पुढे रवाना झाली. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास भोगावा लागला आहे.

2 मे पासून नियमित धावणार

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार २ मे पासून दर शुक्रवारी लोकमान्य टिळत टर्मिनस ते सहरसा अमृत भारत ट्रेन धावणार आहे. लोकमान्य टिळत टर्मिनस ही ट्रेन दुपारी १२ वाजता सुटणार आहे रात्री ११.४५ वाजता इटारसी, दुसऱ्या दिवशी शनिवारी ३.१० वाजता जबलपुर, सकाळी ५.५० वाजता सतना आणि तिसऱ्या दिवशी रविवारी मध्यरात्री २ वाजता सहरसा पोहचणार आहे.

असे असणार वेळापत्रक

ट्रेन क्र. ११०१५ ही २ मे २०२५ पासून दर शुक्रवारी दुपारी १२:०० वाजता एलटीटी मुंबईहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी २:०० वाजता सहरसा येथे पोहोचेल.

हे सुद्धा वाचा

ट्रेन क्र. ११०१६ ४ मे २०२५ पासून दर रविवारी ४:२० वाजता सहरसा येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी १५:४५ वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल.

ट्रेनचे साधेपणाने स्वागत

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केल्याने देशभर दुखवटा असल्यामुळे गाडीचे स्वागत अत्यंत थंडपणे झाले. मध्य प्रदेशातील जबलपुरात या गाडीच्या साधेपणाने स्वागत केले गेले. ही ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर थांबली आणि २५ मिनिटांनंतर पुढील प्रवासासाठी निघून गेली. जबलपूर येथून ४ प्रवासी या गाडीत चढले.

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर जंक्शन, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, हसनपूर रोड, सलौना आणि खगरिया जंक्शन.

डब्यांची रचना : ०८ स्लीपर क्लास, ११ जनरल सेकंड क्लास, एक पॅन्ट्री कार आणि ०२ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन

आरक्षण : ट्रेन क्र. ११०१५ चे बुकिंग आजपासून सुरू करण्यात आले आहे.

त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी.
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर.
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर.
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव.
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी.
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री.
भारताच्या स्ट्राईकनंतर संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला
भारताच्या स्ट्राईकनंतर संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला.
म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं
म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं.
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?.