Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास आठवलेंच्या आरपीआय पक्षाची ‘या’ राज्यातही एन्ट्री, 10 जागांवर लढणार

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आगामी आसाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे (Ramdas Athawale on Assam Election 2021)

रामदास आठवलेंच्या आरपीआय पक्षाची 'या' राज्यातही एन्ट्री, 10 जागांवर लढणार
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 9:45 PM

दिसपूर (आसाम) : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आगामी आसाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. ते रविवारी गुवाहाटीच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान पत्रकारांसोबत बोलताना आगामी आसामच्या विधानसभा निवडणुकीत आरपीआय दहा जागांवर लढेल, अशी घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर या निवडणुकीत भाजपसोबत युती करु, असंही त्यांनी सांगितलं (Ramdas Athawale on Assam Election 2021).

आठवले नेमकं काय म्हणाले?

“आसामच्या आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआय दहा जागांवर आपले उमेदवार उभे करेल. एनडीएचा मित्रपक्ष असल्याने आरपीआय लवकर राज्यातील युतीबाबत भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बातचित करेल”, असं आठवले यांनी सांगितलं (Ramdas Athawale on Assam Election 2021).

“या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत सर्बानंद सोनोवाल नक्की पुन्हा मुख्यमंत्री होतील. माझ्या आरपीआय पक्षाचा त्यांना पाठिंबा असेल. जर आरपीआय दहा पैकी पाच-सहा जागांवर विजयी झाली तर आम्ही भाजपसोबत युती करुन बहुमताने एकत्र येऊ”, असं रामदास आठवले म्हणाले.

येत्या मार्च-एप्रिल महिन्यात पश्चिम बंगाल आणि केरळसह आसाम राज्यातही विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. आसाममध्ये 126 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 2016 च्या निवडणुकीत तिथे भाजप सर्वाधिक 60 जागांवर विजयी होऊन मोठा पक्ष बनला होता. आसाममधील भाजप सरकारला सध्या आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटचा पाठिंबा आहे.

हेही वाचा : प्लॅटिना बाईक ते आंतराष्ट्रीय क्रिकेट सामना, ऑस्ट्रेलियात वर्णभेदाची टीका, वाचा मोहम्मद सिराजची संघर्षगाथा

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.