समृद्धी महामार्गाचे फायदे!

चला तर मग जाणून घेऊयात समृद्धी महामार्गाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी.

समृद्धी महामार्गाचे फायदे!
samruddhi mahamarg Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 11, 2022 | 12:24 PM

भाजप-शिवसेना युतीच्या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना या समृद्धी महामार्गाचे बांधकाम सुरू झाले. विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन या वर्षाच्या सुरुवातीला होणार होते, परंतु कोविड महामारीमुळे त्याला उशीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण संपन्न झालंय. चला तर मग जाणून घेऊयात समृद्धी महामार्गाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी.

  1. या महामार्गाचं हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं अधिकृत नामकरण करण्यात आलंय. मुंबई-नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे म्हणूनही त्याची ओळख आहे.
  2. सरकारच्या मते, 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. हे दोन्ही प्रदेश दुष्काळी भाग आहेत.
  3. हा एक्स्प्रेस वे 520 किमीसाठी सज्ज असला तरी उर्वरित 181 किमीचा महामार्ग 2024 पर्यंत तयार होईल. यामुळे शिर्डी आणि मुंबई जोडली जाणारे आणि महामार्ग भिवंडी जिल्ह्यात संपणार आहे.
  4. नागपूरहून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (JNPT) दिशेने जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांद्वारे द्रुतगती मार्गाचा वापर केला जाणार असल्याने, ठाण्यातील वडपे ते माजिवडा या भागांदरम्यानच्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या मुंबई-नाशिक महामार्गाचे (NH3) नूतनीकरण करण्याचाही सरकारचा विचार आहे.
  5. एक्स्प्रेस वे खुला झाल्यानंतर राज्यातील पर्यटनालाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे कारण यामुळे शिर्डी, लोणार सरोवर, वेरूळ, अजिंठा, औरंगाबाद, एलोरा, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर, पंचवटी आणि इगतपुरी मधील हिल स्टेशन जोडले जाणार आहेत.
  6. महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाचा वेळ जवळपास सहा तासांनी कमी होणार आहे. सध्या मुंबई-धुळे (NH3) आणि धुळे-नागपूर (NH6) दरम्यानचा प्रवासाचा वेळ 16 तासांच्या जवळपास आहे. म्हणजे नागपूर ते मुंबई अंतर जवळपास 9 ते 10 तासात पार करता येणार.
  7. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे अंदाजे 55 हजार कोटी रुपये खर्चून आठ पदरी मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येत आहे.
  8. हा द्रुतगती मार्ग राज्यातील 14 जिल्हे, सहा तालुके आणि 392 गावांमधून जाणार आहे.
  9. हा महामार्ग देशातील सर्वात वेगवान महामार्ग म्हणूनही ओळखला जात आहे. या महामार्गावर आपण 150 किमी प्रतितास वेगाने वाहन चालवू शकतो.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.