Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today : ‘अग्निपथ योजने’च्या विरोधाबाबत रविशंकर म्हणाले – ट्रेन जाळून उपयोग नाही, तरुणांनी नवीन संधीचा स्वीकार करावा

माजी केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ‘अग्निपथ योजने’ला तरुणांकडून होत असलेल्या विरोधाबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, तरुणांनी योजनेबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, उगाच विरोध करण्यापेक्षा या योजनेकडे नवीन संधी म्हणून पाहणे गरजेचे आहे.

What India Thinks Today : ‘अग्निपथ योजने’च्या विरोधाबाबत रविशंकर म्हणाले - ट्रेन जाळून उपयोग नाही, तरुणांनी नवीन संधीचा स्वीकार करावा
टीव्ही 9 ग्लोबल समिटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 8:38 PM

भारतातील नंबर एक न्यूज नेटवर्क TV9 तर्फे आयोजित ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट’ (What India Thinks Today Global Summit) च्या पहिल्या सत्रात, माजी केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ‘अग्निपथ योजने’वर आपले विचार मांडले. प्रसाद यांनी सर्वप्रथम तरुणांना शांतता राखण्याचे आवाहन केले. रेल्वेची संपत्ती ही देशाची संपत्ती असल्याने अशा प्रकारे रेल्वेला लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. तुम्ही लोकही या ट्रेनमधूनच प्रवास करता, त्यामुळे ती जाळण्यात काही फायदा नाही. तरुणांचे म्हणणे ऐकूनच अग्निपथ योजना (Agneepath Yojana) आणण्याचे काम सरकारने केले आहे. कोरोनामुळे तरुणांना संधी मिळू शकत नसल्याची तक्रार समोर आल्यानंतर, सरकारने वयोमर्यादेतही दोन वर्षांची वाढ केली. तरुणांसाठी ही एक नवीन संधी (A new opportunity) असून, त्याला विरोध न करता तरुणांनी या संधीचा स्वीकार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘इंडिया फर्स्ट’शी संबंधित प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी भारत म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. भारत हा फक्त भूगोल नसून, त्यापेक्षा ते कितीतरी पटीने जास्त आहे, असा आमचा पक्ष मानतो. आज जगभर भारताचा आवाज ऐकू येतो. मग ते कोरोनाचे असो किंवा रशिया-युक्रेनचे युद्ध असो. हे शक्य झाले कारण भारत हा लोकशाही देश आहे. हल्ला करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता आता भारताकडे आहे. बालाकोट असो वा उरी, अशा स्थितीत भारताचा प्रथम विचार करता येईल.

रविशंकर प्रसाद म्हणाले, आम्हाला या देशातील मुस्लिमांची कमी मते मिळतात. ही वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे. देशात जनधन योजना सुरू झाली, तेव्हा त्याचा लाभ मुस्लिम जनतेला दिला गेला नाही का? जेव्हा प्रत्येक गावात वीज पुरवठा करण्यात आला, तेव्हा मुस्लिम गावेही त्यात समाविष्ट होती. देशाला एकसंघ करणारे सरदार पटेल यांचे 1950 मध्ये निधन झाले. परंतु, त्यांना भारतरत्न देण्यास 1991 साली उजाडले. याची आम्हाला खंत वाटते. त्याचप्रमाणे महान भारतीय मौलाना आझाद यांचे 1958 मध्ये निधन झाले आणि त्यांना 1991 मध्ये भारतरत्न मिळाले.

हे सुद्धा वाचा

अग्निपथ योजना तरुणांसमोर नवी संधी

अग्निपथ योजनेवर बोलताना भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, तरुणांनी ही महत्त्वाकांक्षी योजना नीट समजून घेण्याची गरज आहे. तरुणांनी अशांतता निर्माण करू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन करून ते म्हणाले की, रेल्वे मालमत्तेचे नुकसान करून काहीही मिळणार नाही. अग्निपथ योजना तरुणांसमोर एक नवीन संधी बनत आहे, तरुणांनी आधी त्याची चाचणी घेऊन मग मत व्यक्त करणे योग्य होईल.

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.