Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात तुर्कस्तान सारखा भूकंप येऊ शकतो का? आला तर काय होईल? पाहा तज्ज्ञ काय सांगतात

भारतात तुर्कस्तान सारखा भूकंप झाला तर काय परिस्थिती उद्भवू शकते. भारतात मोठ्या भूकंपाची शक्यता किती आहे. जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात. भारत या संकटाचा सामना करण्यासाठी किती तयार आहे?

भारतात तुर्कस्तान सारखा भूकंप येऊ शकतो का? आला तर काय होईल? पाहा तज्ज्ञ काय सांगतात
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 6:23 PM

मुंबई : तुर्कस्तान आणि सीरियात झालेल्या भूकंपामुळे 30,000 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. दरम्यान मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. तुर्कस्तानमध्ये झालेल्या मोठ्या जीवितहानीमुळे बांधकाम व्यावसायिकांवर आता सरकारने कारवाई सुरु केली आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अनेक इमारती कोसळल्या आणि अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. भूकंपाची २ दिवस आधीच शक्यता वर्तवणाऱ्या संशोधकांना भारतात आणि आजुबाजुच्या देशातही भूकंपाची शक्यता वर्तवली आहे. जर तुर्कस्तानसारखा भूकंप भारतात झाला तर काय होईल, असा प्रश्न अनेक भारतीय लोकांच्या मनात असेल. भूकंप आला तर त्याचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत का?

भारतात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवत असतात. पण त्याची तीव्रता ही कमी असल्याने सुदैवाने कोणतीही हानी होत नाही. पण याचा फायदा असा होतो की, यामुळे एकदाच मोठा भूकंप होत नाही. तज्ज्ञ सांगतात की, ट्रिपल जंक्शन हा एक बिंदू आहे जिथे 3 टेक्टोनिक प्लेट सीमा एकत्र येतात. भूगर्भीय क्रियाकलापांमधील ही महत्त्वाची क्षेत्रे आहेत आणि भूकंप आणि ज्वालामुखीच्या क्रियाकलापांची महत्त्वाची ठिकाणे असू शकतात. या प्लेट्सच्या हालचालीमुळे पृथ्वीच्या वरच्या पृष्ठभागावर दबाव निर्माण होऊ शकतो जो भूकंपाच्या स्वरूपात दिसू शकतो.

भारतातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देशाने आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्याकडे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) च्या रूपात एक समर्पित आणि प्रशिक्षित सैन्य असल्याने मोठ्या प्रमाणावर भूकंपांना तोंड देण्यासाठी भारत सज्ज आहे. तज्ज्ञांच्या मते छोटे-छोटे धक्के दबाव कमी करण्यास आणि भारताला विनाशकारी भूकंपापासून वाचविण्यात मदत करत आहेत. पण भक्कम इमारती बनवण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास मोठ्या प्रमाणावर भूकंपाचा प्रभाव कमी होऊ शकतो. शिवाय हानी देखील कमी होऊ शकते.

तुर्कीमध्ये 2 ट्रिपल जंक्शन होते. या प्रदेशात भूकंपाचे छोटे धक्के आले नाहीत, त्यामुळे खूप दबाव जमा झाला. भारत हा भूकंपप्रवण प्रदेश आहे, पण आपले सुदैव आहे की आपल्याकडे दररोज अनेक छोटे-मोठे भूकंप होतात, त्यामुळे संचित ऊर्जा बाहेर पडते.

भूकंपामुळे होणारे नुकसान कमी कसे करावे

तज्ज्ञांच्या मते, भूकंपाच्या वेळी इमारतीचे होणारे नुकसान कमी करण्यात त्याची रेझोनंट वारंवारता महत्त्वाची भूमिका बजावू शकते. इमारतींमध्ये रेझोनंट फ्रिक्वेन्सी नावाच्या कंपनांची नैसर्गिक फ्रिक्वेन्सी असते जी त्यांच्या वस्तुमान, कडकपणा आणि आकाराद्वारे निर्धारित केली जाते. भूकंपाच्या आधारावर, जमिनीवरील क्रियाकलाप या नैसर्गिक फ्रिक्वेन्सी वाढवू शकतात, ज्यामुळे इमारत त्याच्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीमध्ये कंप पावते. भूविज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतातील ५९ टक्के जमीन भूकंपासाठी असुरक्षित आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.